लाईफस्टाईल

शिळे अन्न देतंय गंभीर आजाराला आमंत्रण; जाणून घ्या दुष्परिणाम

भारतामध्ये बहुतांश लोकांना शिळे अन्न (Stale food) खाण्याची सवय असते. आदल्या दिवशीचे अन्न फ्रीजमध्ये ठेऊन दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने आरोग्यावर अनेक प्रकारे नकारात्मक परिणाम होतात. सतत शिळे अन्न खाल्ल्याने पचनक्रिया बिघडू शकते, विषबाधा होऊ शकते, आणि काहीवेळा गंभीर आजारही होऊ शकतात.

नेहा जाधव - तांबे

भारतामध्ये बहुतांश लोकांना शिळे अन्न (Stale food) खाण्याची सवय असते. आदल्या दिवशीचे अन्न फ्रीजमध्ये ठेऊन दुसऱ्या दिवशी खाल्ल्याने आरोग्यावर अनेक प्रकारे नकारात्मक परिणाम होतात. सतत शिळे अन्न खाल्ल्याने पचनक्रिया बिघडू शकते, विषबाधा होऊ शकते, आणि काहीवेळा गंभीर आजारही होऊ शकतात. त्यामुळे, शिळे अन्न खाणे शक्यतो टाळणेच फायद्याचे ठरते. शिळे अन्न म्हणजे जे अन्न तयार केल्यानंतर बराच वेळ ठेवले गेले आहे, विशेषतः योग्य तापमान व स्वच्छतेची काळजी न घेतल्यास त्यामध्ये सूक्ष्मजीव वाढतात. अशा अन्नाचे सेवन केल्याने आरोग्यावर अनेक दुष्परिणाम होऊ शकतात.

प्रमुख दुष्परिणाम -

विषबाधा होण्याचा धोका -

शिळ्या अन्नामुळे विषबाधा होण्याचा धोका वाढतो. त्यात Salmonella, E. coli, Listeria सारखे घातक बॅक्टेरिया वाढू शकतात. यामुळे उलटी, मळमळ, जुलाब आणि ताप अशी लक्षणे दिसतात. त्यामुळे शरीरात पाणी आणि क्षारांची कमतरता निर्माण होऊ शकते.

पचनाच्या समस्या -

शिळे अन्न पचायला कठीण असते, त्यामुळे अपचनाची शक्यता वाढते. असे अन्न खाल्ल्याने गॅस, अॅसिडिटी आणि छातीत जळजळ होऊ शकते. पचनसंस्थेवर ताण येतो आणि दीर्घकाळ सेवन केल्यास पचनक्रिया कमजोर होते.

रोगप्रतिकारक शक्ती कमी होणे -

अशुद्ध किंवा शिळ्या अन्नामुळे शरीरात विषारी घटक साचू लागतात. हे घटक शरीराची नैसर्गिक रोगप्रतिकारक शक्ती (इम्युनिटी) कमी करतात. यामुळे सर्दी, खोकला, ताप यांसारखे छोटे आजार वारंवार होऊ लागतात. दीर्घकाळ असे अन्न खाल्ल्यास गंभीर संसर्गजन्य आजारांची शक्यता वाढते.

त्वचेचे विकार व अ‍ॅलर्जी -

शिळ्या अन्नामध्ये वाढलेली बुरशी व जीवाणू त्वचेसाठी हानिकारक ठरू शकतात. काही लोकांना त्यामुळे अ‍ॅलर्जी, पुरळ, खाज, लाल चट्टे यांसारखे त्रास होऊ शकतात. अशा लक्षणांकडे दुर्लक्ष केल्यास त्वचेचे गंभीर विकार निर्माण होऊ शकतात. संवेदनशील त्वचा असणाऱ्यांनी शिळे अन्न टाळणेच योग्य ठरते.

अन्नातून होणारे संसर्गजन्य आजार -

दीर्घकाळ शिळे किंवा अस्वच्छ पद्धतीने साठवलेले अन्न खाल्ल्यास अन्नातून संसर्गजन्य आजार होऊ शकतात. Typhoid, Cholera आणि Dysentery यांसारखे आजार होण्याची शक्यता वाढते. हे आजार पाणी आणि अन्नातून पसरणाऱ्या जीवाणूंमुळे होतात. स्वच्छता आणि ताजे अन्न हेच अशा आजारांपासून बचावाचे प्रभावी उपाय आहेत.

Navi Mumbai : रबाळे एमआयडीसीतील कंपनीला भीषण आग; परिसरात धुराचे लोट, Video

शक्तिपीठ महामार्गासाठी भूसंपादनाला मिळाली गती; शेतकऱ्यांचा विश्वास जिंकण्यासाठी कार्यशाळांचे आयोजन

HDFC बँकेचे सीईओ जगदीशन यांनी पुनर्नियुक्ती नाकारली; प्रशासकीय चिंतेचे कारण

गणेशोत्सवात प्लाझ्मा, लेझर वापराला बंदी; पुणे ग्रामीण पोलिसांचा महत्त्वपूर्ण निर्णय

भाईंदरमध्ये ४.६४ लाख मतदार यादीतून 'गायब'; राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण