महाराष्ट्र

‘पश्चाताप’ महायुतीला बारामतीत विजय मिळवून देईल? शिवसेना खासदार संजय राऊत यांची उपरोधिक शंका

महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या काही राजकीय कृत्यांचा आता पश्चात्ताप करण्यात काहीच अर्थ नाही, या पश्चातापाने महायुतीला बारामतीमध्ये येणाऱ्या...

Swapnil S

मुंबई : महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी त्यांच्या काही राजकीय कृत्यांचा आता पश्चात्ताप करण्यात काहीच अर्थ नाही, या पश्चातापाने महायुतीला बारामतीमध्ये येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत विजय मिळेलच असेही नाही, अशी टीका शिवसेनेचे (ठाकरे गट) खासदार संजय राऊत यांनी सोमवारी केली.

राऊत यांनी सांगितले की, काका शरद पवार आणि त्यांच्या पक्षाशी अजित पवार यांनी जे केले त्याबद्दल त्यांनी पश्चात्ताप करण्यात आता काहीही अर्थ नाही. अजित पवार बारामती विधानसभा निवडणुकीत नक्कीच पराभूत होतील. मुंबई दौऱ्यावर असलेले केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावरही राऊत यांनी निशाणा साधला. ते म्हणाले, भाजप नेते मुंबईला राजकीय आणि आर्थिकदृष्ट्या कमकुवत करत राहतील. आम्ही या भाजप नेत्यांच्या अशा धोरणांच्या विरोधात आहोत.

नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत अजित पवार यांनी पत्नी सुनेत्रा यांना चुलत बहीण आणि राष्ट्रवादीच्या (शरद पवार गट) खासदार सुप्रिया सुळे यांच्याविरोधात उमेदवारी दिली होती. मात्र आपण ही चूक केल्याचे अजित पवार यांनी नुकतेच जाहीरपणे कबूल केले होते.

शिवरायांचे किल्ले ‘युनेस्को’च्या जागतिक वारसास्थळ यादीत

मोस्ट वॉन्टेड दहशतवाद्याचा कॅनडातील कपिल शर्माच्या कॅफेवर गोळीबार

सरकारची इलेक्ट्रिक ट्रक प्रोत्साहन योजना सुरू; PM e-Drive अंतर्गत ९.६ लाख रु.मिळणार

टेस्ला पुढील आठवड्यात भारतात प्रवेश करण्यास सज्ज; वांद्रे-कुर्ला कॉम्प्लेक्समध्ये पहिले शोरूम सुरू करणार

अजित पवारांची माफी मागा! लक्ष्मण हाके यांना राष्ट्रवादीची नोटीस