महाराष्ट्र

आयोजकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; अंबादास दानवेंची मागणी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी पत्रकार परिषद घेत केली सांस्कृतिक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

नवशक्ती Web Desk

"महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेला महाराष्ट्राचा सांस्कृतिक विभाग दोषी असून संबंधित विभागाच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा," अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी केली आहे. ते म्हणाले की, "नवी मुंबई मधील खारघर येथे झालेल्या सोहळ्यामध्ये उष्माघातामुळे मृत्यू पावलेल्यांचा नेमका आकडा लपवला जात आहे," असा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला.

अंबादास दानवे पुढे म्हणाले की, "रविवारी घडलेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी होती. मी रुग्णालयात येऊन रुग्णांची विचारपूस केली असून त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार सुरु आहेत, यात शंका नाही. हा कार्यक्रम राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केला होता. सांस्कृतिक विभागाच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण याची जबाबदारी सरकारची होती. या घटनेमुळे सरकारचे नाव खराब झाले आहे. या विभागाच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा." अशी मागणी त्यांनी केली.

हरिनामाच्या गजराने विठ्ठलाची पंढरी दुमदुमली! पंढरीत १५ लाखांवर वैष्णवांची मांदियाळी; आषाढी एकादशीचा आज मुख्य सोहळा !

महागड्या शक्तिपीठ महामार्गाला आमचा विरोध; सुप्रिया सुळे यांचे ठाम प्रतिपादन

आवाज मराठीचाच! उद्धव-राज ठाकरे तब्बल २० वर्षांनंतर एकाच मंचावर; राज्यभरातील मराठी माणसांमध्ये आनंदाचे वातावरण

डोममध्ये रंगला झिम्मा; शर्मिला ठाकरे, सुषमा अंधारे यांची फुगडी

देशात गरीबांची संख्या वाढणे ही चिंता वाढवणारी बाब; केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे प्रतिपादन