महाराष्ट्र

आयोजकांवर मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा; अंबादास दानवेंची मागणी

विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंनी पत्रकार परिषद घेत केली सांस्कृतिक मंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी

नवशक्ती Web Desk

"महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळ्यादरम्यान झालेल्या दुर्घटनेला महाराष्ट्राचा सांस्कृतिक विभाग दोषी असून संबंधित विभागाच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करा," अशी मागणी विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते आणि शिवसेना ठाकरे गटाचे नेते अंबादास दानवेंनी केली आहे. ते म्हणाले की, "नवी मुंबई मधील खारघर येथे झालेल्या सोहळ्यामध्ये उष्माघातामुळे मृत्यू पावलेल्यांचा नेमका आकडा लपवला जात आहे," असा गंभीर आरोपदेखील त्यांनी केला.

अंबादास दानवे पुढे म्हणाले की, "रविवारी घडलेली दुर्घटना अतिशय दुर्दैवी होती. मी रुग्णालयात येऊन रुग्णांची विचारपूस केली असून त्यांच्यावर योग्य पद्धतीने उपचार सुरु आहेत, यात शंका नाही. हा कार्यक्रम राज्य सरकारच्या सांस्कृतिक विभागाने आयोजित केला होता. सांस्कृतिक विभागाच्या आयोजकांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल झाला पाहिजे. कारण याची जबाबदारी सरकारची होती. या घटनेमुळे सरकारचे नाव खराब झाले आहे. या विभागाच्या मंत्र्यांनी राजीनामा द्यायला हवा." अशी मागणी त्यांनी केली.

इटलीत दोन भारतीयांची गोळ्या झाडून हत्या; वैशाखी उत्सवादरम्यान गुरुद्वाराबाहेर हल्ला

'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी तन्वी कोलतेच्या नावावर; राकेश बापट उपविजेता

घर बसल्या पार्किंगची सुविधा तूर्तास कागदावरच; मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यास मुहूर्त मिळेना; अखेर पुन्हा नव्याने निविदा काढणार

Thane : नगरसेवकांना निवृत्तीवेतन द्यावे; माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची सूचना; सोमवारच्या महासभेत येणार चर्चेला

दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण? लेक दुआच्या 'क्यूट' पोस्टमुळे रंगल्या चर्चा