महाराष्ट्र

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांची गर्दी; मध्य रेल्वेकडून २० अतिरिक्त गणपती विशेष गाड्या जाहीर; ७ ऑगस्टपासून आरक्षण

कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी गर्दी लक्षात घेत, मध्य रेल्वेने आणखी २० अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : मध्य, पश्चिम आणि कोकण रेल्वेने गणेशोत्सवानिमित्त सोडलेल्या गाड्यांचे आरक्षण फुल झाले आहे. कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांनी गर्दी लक्षात घेत, मध्य रेल्वेने आणखी २० अतिरिक्त फेऱ्या चालविण्याचा निर्णय घेतला आहे. या गाड्यांचे आरक्षण ७ ऑगस्टपासून सुरू होणार आहे. गणपती उत्सवासाठी मध्य रेल्वेने आतापर्यंत २२२ गणपती विशेष गाड्या जाहीर केल्या आहेत.

लोकमान्य टिळक टर्मिनस - रत्नागिरी द्विसाप्ताहिक विशेषच्या ८ फेऱ्या होतील. ०१०३१ विशेष गाडी लोकमान्य टिळक टर्मिनस येथून ६ सप्टेंबर, ७, १३, १४ सप्टेंबर रोजी ८ वाजता सुटेल. रत्नागिरी येथे दुसऱ्या दिवशी ४:५० वाजता पोहोचेल. ०१०३२ विशेष गाडी रत्नागिरी येथून ७ सप्टेंबर, ८, १४, १५ सप्टेंबर रोजी सकाळी ८:४० वाजता सुटेल. लोकमान्य टिळक टर्मिनस येथे त्याच दिवशी ५ :१५ वाजता पोहोचेल. ठाणे, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल.

पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या ४ फेऱ्या होतील. ०१४४३ विशेष गाडी पनवेल येथून ८ आणि १५ रोजी ४:४० वाजता सुटेल. रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. ०१४४४ विशेष गाडी रत्नागिरी येथून ७ आणि १४ रोजी ५:५० वाजता सुटेल. पनवेल येथे दुसऱ्या दिवशी १:३० वाजता पोहोचेल. पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल.

पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या ४ फेऱ्या होतील. ०१४४७ विशेष गाडी पुणे येथून ७ आणि १४ रोजी ००:२५ वाजता सुटेल आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. ०१४४८ विशेष गाडी रत्नागिरी येथून ८ आणि १५ रोजी ५:५० वाजता सुटेल. पुणे येथे दुसऱ्या दिवशी ५:०० वाजता पोहोचेल. चिंचवड, तळेगाव, लोणावळा, कल्याण, पनवेल, पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल.

पनवेल-रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या २ फेऱ्या होतील. ०१४४१ विशेष गाडी ११ रोजी ४:४० वाजता पनवेल येथून. आणि रत्नागिरी येथे त्याच दिवशी ११:५० वाजता पोहोचेल. ०१४४२ विशेष गाडी १० रोजी ५:५० वाजता रत्नागिरी येथून सुटेल. पनवेल येथे दुसऱ्या दिवशी १:३० वाजता पोहोचेल. पेण, रोहा, माणगाव, वीर, करंजाडी, खेड, चिपळूण, सावर्डा, आरवली रोड आणि संगमेश्वर रोड येथे थांबेल. पुणे-रत्नागिरी साप्ताहिक विशेषच्या २ फेऱ्या होतील.

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती

श्रीरामपूरमधील जमीन मंत्र्याच्या घशात घालण्याचा डाव! काँग्रेसचे विजय वडेट्टीवार यांचा आरोप

Mumbai : पालिका मुख्यालयातील उपहारगृहाचा गॅससाठा संपला; रोजच्या १५०० लोकांच्या जेवणाचे वांदे

Thane : व्यावसायिक गॅस सिलिंडरचा काळाबाजार; हॉटेल व्यावसायिकांची कारवाईची मागणी

खटला सुरू नसताना आरोपीला बेमुदत काळासाठा डांबता येणार नाही! सत्र न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्वाळा