महाराष्ट्र

अखेर ३२ वर्षांनंतर त्यांनी पायात वहाणा घातल्या

जळगांवमधील कारसेवक विलास भावसार यांनी १९९२ साली ही प्रतिज्ञा केली होती.

Swapnil S

मुंबई : जोवर अयोध्येत श्रीराम मंदिर निर्माण होत नाही तोपर्यंत मी पायात वहाणा घालणार नाही, असा पण केलेल्या कारसेवक विलास भावसार (६०) यांनी अखेर ३२ वर्षांनंतर पायात वहाणा घातल्या.

जळगांवमधील कारसेवक विलास भावसार यांनी १९९२ साली ही प्रतिज्ञा केली होती. सोमवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते रामलल्लाचा प्राणप्रतिष्ठा सोहळा संपन्न झाला आणि इकडे महाराष्ट्रात विलास भावसार यांनी पायात वहाणा सरकवल्या. भाजपचे नेते व मंत्री गिरीश महाजन यांनी भावसार यांना चपला भेट दिल्या. जळगाव जिल्ह्यातील जामनेर येथे एका कार्यक्रमादरम्यान त्यांनी भावसार यांना ही भेट दिली. भावसार एक सामान्य कारसेवक आणि परम रामभक्त पानपट्टी चालवून आपला उदरनिर्वाह करतात. आपले स्वप्न पूर्ण झाल्याबद्दल ते खूप खुश झाले आहेत. १९९२ साली बाबरी मशिदीचा ढाचा पाडल्यानंतर याच ठिकाणी मंदिर बांधून होत नाही तोपर्यंत आपण पायात चप्पल घालणार नाही, असा पण त्यांनी केला होता व तो पाळलाही होता.

डेटा सेंटर कंपन्यांना त्वरित जागा द्या! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश

Thane : नगरसेवकांना निवृत्तीवेतन द्यावे; माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची सूचना; सोमवारच्या महासभेत येणार चर्चेला

Mira-Bhayandar : भाजपा पाठोपाठ शिंदे गट देखील आक्रमक; आमदार नरेंद्र मेहतांना तडीपार करण्यासह गुन्हा दाखल करण्याची मागणी

Mumbai : सोलर बाकावर मोबाईल चार्जिंग अन् वायफाय; पालिकेच्या उद्यानात उपक्रम

Mumbai : पार्ल्यात उड्डाणपुलाखाली पहिलाच शहरी शेती प्रकल्प; फळभाज्यांची लागवड, शहरी शेती अभ्यास वर्ग भरणार