महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाकडून रश्मी बर्वे यांची निराशा

रामटेक मतदारसंघातून काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द ठरवले होते. त्यामुळे बर्वे यांचा लोकसभा उमेदवारी अर्जही रद्द झाला होता.

Swapnil S

नवी दिल्ली : काँग्रेसच्या रामटेक मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांच्या पदरी सर्वोच्च न्यायालयाकडूनही निराशाच पडली आहे. बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्याविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

रामटेक मतदारसंघातून काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द ठरवले होते. त्यामुळे बर्वे यांचा लोकसभा उमेदवारी अर्जही रद्द झाला होता. समितीच्या या निर्णयाविरुद्ध बर्वे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समितीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली होती. त्यानंतर बर्वे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बर्वे यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. दरम्यान, रामटेक मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात रश्मी बर्वे यांच्या उमेदवारीबाबत शंका निर्माण झाल्याने आता बर्वे यांचे पती रिंगणात उतरणार असल्याचे समजते.

८९ हजार कोटींच्या गुंतवणुकीला चालना; पाच अतिविशाल प्रकल्पांना विशेष प्रोत्साहन, २० हजार प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष रोजगार निर्मिती होणार

देशात उष्णतेचा कहर; वाढत्या तापमानात पंतप्रधान मोदींचे नागरिकांना आवाहन, पुरेसे पाणी प्या आणि 'या' गोष्टींची काळजी घ्या

Mumbai : मुलुंड डम्पिंग ग्राऊंडला युद्धाचा फटका; डिझेलच्या कमतरतेमुळे काम करणे अशक्य, कचरा वाहून नेण्यासाठी होतेय अडचण

Mumbai : मध्य रेल्वेकडून दरवाढीचा प्रस्ताव रद्द; रेल्वे स्टॉलवरील वडा पाव-समोसा जुन्याच किंमतीत मिळणार

Mumbai : लोकलमध्ये दाम्पत्य विसरले १० लाखांच्या दागिन्यांची बॅग; रेल्वे पोलिसांच्या तत्परतेमुळे ऐवज सापडला