महाराष्ट्र

सर्वोच्च न्यायालयाकडून रश्मी बर्वे यांची निराशा

रामटेक मतदारसंघातून काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द ठरवले होते. त्यामुळे बर्वे यांचा लोकसभा उमेदवारी अर्जही रद्द झाला होता.

Swapnil S

नवी दिल्ली : काँग्रेसच्या रामटेक मतदारसंघातील उमेदवार रश्मी बर्वे यांच्या पदरी सर्वोच्च न्यायालयाकडूनही निराशाच पडली आहे. बर्वे यांचा उमेदवारी अर्ज बाद ठरवण्याविरोधातील याचिका सर्वोच्च न्यायालयाने फेटाळली आहे.

रामटेक मतदारसंघातून काँग्रेसने रश्मी बर्वे यांना उमेदवारी दिली होती. मात्र, त्यांचे जात प्रमाणपत्र जात पडताळणी समितीने रद्द ठरवले होते. त्यामुळे बर्वे यांचा लोकसभा उमेदवारी अर्जही रद्द झाला होता. समितीच्या या निर्णयाविरुद्ध बर्वे यांनी उच्च न्यायालयात दाद मागितली होती. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने समितीच्या निर्णयाला अंतरिम स्थगिती दिली होती. त्यानंतर बर्वे यांनी सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली होती. मात्र, सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक प्रक्रियेत हस्तक्षेप करण्यास नकार दिला आहे. त्यामुळे बर्वे यांना अद्याप दिलासा मिळालेला नाही. त्यांच्या पदरी निराशाच पडली आहे. दरम्यान, रामटेक मतदारसंघातून शिवसेनेच्या शिंदे गटाकडून राजू पारवे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या विरोधात रश्मी बर्वे यांच्या उमेदवारीबाबत शंका निर्माण झाल्याने आता बर्वे यांचे पती रिंगणात उतरणार असल्याचे समजते.

आजचे राशिभविष्य, ३० ऑक्टोबर २०२५ : जाणून घ्या तुमच्या दिवसाचे ग्रहसंकेत

दर्जाहीन कृत्रिम वाळूवर टाच! एम-सँड धोरणात मोठी सुधारणा; अंमलबजावणीचे अधिकार शासनाकडून जिल्हाधिकाऱ्यांना; निर्णय जारी

Mumbai News : मध्य आणि पश्चिम रेल्वेवर BMC मेहेरबान; रेल्वेकडे ५०० कोटी रुपयांचे पाणी बिल थकीत!

वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूटच्या निधीची चौकशी होणार; राज्य सरकारकडून निधी तपासण्याचे आदेश

महाराष्ट्राचे स्वप्न साकार झाले; ठाण्यातील ‘त्या’ फलकाची चर्चा!