महाराष्ट्र

सरकारने फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन जरांगेंच्या तब्येतीची दखल घ्यावी, मनसे आमदार पाटील यांचे ट्विट

मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण केले आहे.

Swapnil S

डोंबिवली : मराठा संघर्ष योद्धा मनोज जरांगे-पाटील यांनी पुन्हा मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण केले आहे. उपोषणाला चार-पाच दिवस उलटले असून जरांगे यांनी उपचारास नकार दिला. या उपोषणाकडे सरकारने गांभीर्याने लक्ष द्यावे तसेच सरकारने फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन जरांगेच्या तब्येतीची दखल घ्यावी, असे मनसे नेते तथा कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघाचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी ट्विट केले आहे.

मनोज जरांगे- पाटील यांनी उपोषणास बसल्याचा निर्णय घेतल्यानंतर सरकारने याची दाखल घेत यावर चर्चा करणे आवश्यक होते. मराठा आरक्षणासाठी लाखो-करोडो मराठा बांधवांसाठी संघर्ष करत असलेले मनोज जरांगे-पाटील यांनी मुंबईत मोर्चा काढला होता. या मोर्च्यादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी जरांगे-पाटील यांनी भेट घेऊन आश्वासन दिले होते. मात्र मराठा समाजासाठी आरक्षण मिळणे हे फक्त आश्वासन आहे का असा प्रश्न उपस्थित करत जरांगे-पाटील यांनी पुन्हा आमरण उपोषण सुरू केले. आता त्यांची प्रकृती ढासळत आहे.

यावर मनसे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांनी ट्विट करत सरकारने फोडाफोडीच्या राजकारणातून थोडी उसंत घेऊन सर्वप्रथम जरांगेंच्या तब्येतीची काळजी घ्यावी, अशी मागणी केली आहे. मराठा आरक्षणाबाबत सरकारने काढलेल्या अध्यादेशाची तात्काळ अंमलबजावणी करून, विशेष अधिवेशन बोलावून अध्यादेशाचे कायद्यात रूपांतर करण्यात यावे,आंतरवाली सराटीसह राज्यभरात पोलिसांकडून दाखल करण्यात आलेल्या मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घेण्यात यावेत, राज्यभरात शिंदे समितीच्या वतीने शोधण्यात आलेल्या मराठा कुणबी नोंदींची यादी संबंधित ग्रामपंचायतवर लावण्यात यावी अशी मागणी केली आहे.

संजय राऊत यांना गंभीर आजार; बाहेर जाण्यास, गर्दीत मिसळण्यास निर्बंध, पोस्ट करीत म्हणाले - 'नवीन वर्षात भेटू'

New Rules From November 1: उद्यापासून बँकिंग, GST, आधार आणि पेन्शनमध्ये मोठे बदल; तुमच्यावर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

Powai Hostage Case : 'तो आधी फ्रेंडली होता, नंतर...'; ओलिस ठेवलेल्या मुलीने सांगितला घटनेचा थरार

Powai Hostage Case : माजी मंत्री दीपक केसरकरांचा जुना व्हिडिओ व्हायरल; रोहित आर्यच्या प्रकल्पाचं केलं होतं कौतुक

कल्याणमध्ये ३० वर्षांपासून राहणाऱ्या नेपाळी महिलेचा पर्दाफाश; भारतीय कागदपत्रांसह मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात