महाराष्ट्र

महाराष्ट्र कर्नाटक सीमावाद; माझ्यावर कर्नाटक पोलिसांनी काठी उगारली, या बड्या नेत्याने केले आरोप

बेळगाव येथे आयोजित केलेल्या मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला जाणाऱ्या महाविकास आघाडीच्या नेत्यांना कर्नाटक पोलिसांकडून अडवणूक

प्रतिनिधी

महाराष्ट्र आणि कर्नाटकमधील सीमावाद हा दिवसेंदिवस आणखी चिघळत चालला आहे. कर्नाटक सरकारने महाराष्ट्र एकीकरण समितीचा बेळगावमधील महामेळावा रद्द केल्यानंतर महाराष्ट्रातील नेत्यांना सुद्धा बेळगावमध्ये येण्यास मज्जाव केला. या मेळाव्यामध्ये सहभागी होण्यासाठी राष्ट्रवादीचे नेते हसन मुश्रीफ, शिवसेना ठाकरे गटाचे जिल्हाध्यक्ष विजय देवणे, काँग्रेसचे शहराध्यक्ष सचिन चव्हाण यांच्यासह महाविकास आघाडीचे कार्यकर्ते मोठ्या संख्येने निघाले होते. मात्र, कर्नाटक पोलिसांनी बळाचा वापर करत त्यांना रोखले. यावेळी हसन मुश्रीफ यांनी कर्नाटक पोलिसांनी माझ्यावरही लाठीमार केल्याचा आरोप केला.

कर्नाटक पोलिसांनी रोखल्यानंतर नेत्यांनी कार्यकर्त्यांसह ठिय्या आंदोलन केले. "बेळगावमधील मराठी भाषिकांच्या महामेळाव्याला जाणाऱ्या महाराष्ट्रातील नेतेमंडळी व कार्यकर्त्यांना अडवणे हे कर्नाटकचे धोरण लोकशाहीविरोधी आहे. मराठी भाषिकांवर दडपाशाही करणाऱ्या कर्नाटक सरकारची गुंडगिरी खपवून घेणार नाही," असा इशारा हसन मुश्रीफ यांनी दिला. यावेळी सुमारे एक-दीड तास कर्नाटक पोलीस आणि महाविकास आघाडीचे नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये गोंधळ सुरु होता.

यावेळी हसन मुश्रीफ म्हणाले की, "माझ्या डोळ्यासमोर असलेल्या मराठी बांधवांवर अन्याय होत असताना मी अधिवेशनाला कसा जाऊ शकतो? आम्ही सीमा भागातील नागरिकांना पाठिंबा देण्यासाठी महामेळाव्याला बेळगावमध्ये जात होतो. मात्र, मेळाव्याची परवानगी नाकारली, मंडपदेखील काढले, स्पीकर फेकले या सर्व गोष्टी निषेधार्ह आहेत. मी त्यांचा जाहीर निषेध करतो." दरम्यान, बेळगावमध्ये कर्नाटक सरकारने कलम १४४ लागू केले आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारच्या धोरणामुळे सर्व स्तरांतून टीका होत आहे.

Maharashtra Rain : महाराष्ट्राला पावसाचा तडाखा; ८३ लाख एकरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान

मराठवाडा पूरग्रस्तांसाठी लालबागचा राजा मंडळाची मदत; पारलिंगी समुदायाने मागितला जोगवा, राज्यातील शिक्षकांचाही पुढाकार

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्ततेनंतर लष्करात पुन्हा स्थान; प्रसाद पुरोहित यांची कर्नल पदी बढती

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून