पोलीस भरती मोहिमेसाठी फील्ड टेस्ट वेळेत अखेर बदल 
महाराष्ट्र

पोलीस भरती मोहिमेसाठी फील्ड टेस्ट वेळेत अखेर बदल

उमेदवारांना अति उष्णतेपासून वाचवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी राज्यभरातील त्यांच्या भरती ग्राऊंड टेस्टच्या वेळेत बदल केले आहेत, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. यापूर्वी, बीड जिल्ह्यात निवड प्रक्रियेदरम्यान एका २६ वर्षीय उमेदवाराचा मृत्यू झाला.

Swapnil S

मुंबई : उमेदवारांना अति उष्णतेपासून वाचवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी राज्यभरातील त्यांच्या भरती ग्राऊंड टेस्टच्या वेळेत बदल केले आहेत, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. यापूर्वी, बीड जिल्ह्यात निवड प्रक्रियेदरम्यान एका २६ वर्षीय उमेदवाराचा मृत्यू झाला.

पूर्वी दिवसा घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचण्या आता अति उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सकाळी ५ ते सकाळी ९ आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत अशा दोन सत्रात घेतल्या जातील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

महाराष्ट्रात १५,००० पदांसाठी पोलीस भरती करत आहेत. निवड प्रक्रिया बुधवारी बीडसह अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू झाली. सुरुवातीला, ग्राऊंड टेस्ट दिवसभर आयोजित करण्यात आल्या होत्या.

पहिल्या दिवशी, उमेदवारांनी पुरुषांसाठी १,६०० मीटर धावणे, महिलांसाठी ८०० मीटर धावणे आणि शॉटपूट अशा स्पर्धांमध्ये भाग घेतला. बीडच्या परळी तालुक्यातील मांडखेल येथील रहिवासी दीपक वाघुले हे पहिल्या दिवशी १६०० मीटर धावणे पूर्ण केल्यानंतर काही वेळातच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण तपासात आहे.

छत्रपती संभाजीनगर रेंजच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीडला भेट दिली.

बदलीच्या तक्रारीसाठी पोलिसांना कार्यालयात आणणे गैरवर्तन; मुंबई उच्च न्यायालयाचा महत्त्वाचा निकाल

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

Mumbai Rain : मुसळधार पावसाने मुंबईची दाणादाण! ट्रान्स हार्बर रेल्वे मार्गावर परिणाम, पुढील ४८ तास महत्त्वाचे

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार