पोलीस भरती मोहिमेसाठी फील्ड टेस्ट वेळेत अखेर बदल 
महाराष्ट्र

पोलीस भरती मोहिमेसाठी फील्ड टेस्ट वेळेत अखेर बदल

उमेदवारांना अति उष्णतेपासून वाचवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी राज्यभरातील त्यांच्या भरती ग्राऊंड टेस्टच्या वेळेत बदल केले आहेत, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. यापूर्वी, बीड जिल्ह्यात निवड प्रक्रियेदरम्यान एका २६ वर्षीय उमेदवाराचा मृत्यू झाला.

Swapnil S

मुंबई : उमेदवारांना अति उष्णतेपासून वाचवण्यासाठी महाराष्ट्र पोलिसांनी राज्यभरातील त्यांच्या भरती ग्राऊंड टेस्टच्या वेळेत बदल केले आहेत, असे अधिकाऱ्यांनी शुक्रवारी सांगितले. यापूर्वी, बीड जिल्ह्यात निवड प्रक्रियेदरम्यान एका २६ वर्षीय उमेदवाराचा मृत्यू झाला.

पूर्वी दिवसा घेण्यात येणाऱ्या शारीरिक चाचण्या आता अति उष्णतेपासून बचाव करण्यासाठी सकाळी ५ ते सकाळी ९ आणि सायंकाळी ५ वाजेपर्यंत अशा दोन सत्रात घेतल्या जातील, असे एका वरिष्ठ अधिकाऱ्याने सांगितले.

महाराष्ट्रात १५,००० पदांसाठी पोलीस भरती करत आहेत. निवड प्रक्रिया बुधवारी बीडसह अनेक जिल्ह्यांमध्ये सुरू झाली. सुरुवातीला, ग्राऊंड टेस्ट दिवसभर आयोजित करण्यात आल्या होत्या.

पहिल्या दिवशी, उमेदवारांनी पुरुषांसाठी १,६०० मीटर धावणे, महिलांसाठी ८०० मीटर धावणे आणि शॉटपूट अशा स्पर्धांमध्ये भाग घेतला. बीडच्या परळी तालुक्यातील मांडखेल येथील रहिवासी दीपक वाघुले हे पहिल्या दिवशी १६०० मीटर धावणे पूर्ण केल्यानंतर काही वेळातच कोसळले आणि त्यांचा मृत्यू झाला. अधिकाऱ्यांनी सांगितले की त्यांच्या मृत्यूचे नेमके कारण तपासात आहे.

छत्रपती संभाजीनगर रेंजच्या विशेष पोलीस महानिरीक्षकांसह वरिष्ठ अधिकाऱ्यांनी बीडला भेट दिली.

तलावात राहणाऱ्या 'त्या' मुलाचा व्हिडिओ व्हायरल; मदतीसाठी अनंत अंबानींची धाव, एअरलिफ्टद्वारे मुंबईत आणून केली उपचारांची व्यवस्था

नवी मुंबई : Reel साठी लोकलवर दगडफेक केल्याचा 'अभिनय'? VIDEO व्हायरल होताच तरुणावर कारवाई, माफी मागत म्हणाला...

Kolkata Hotel Fire: हॉटेलमध्ये आगीचा भडका! झोपेतच ९ जणांचा दुर्दैवी अंत, ६ जण जखमी; VIDEO

Dombivli : पादचारी पुलावरील फेरीवाल्यांवर कारवाई; गर्दुल्ले, भिकाऱ्यांना पालिकेने हटवले

Ulhasnagar : पहाटेच्या अंधारात ‘ड्रग्ज डील’चा पर्दाफाश; रामकृष्ण कॉलनीत लाखोंच्या एमडी ड्रग्जसह दोघांना अटक