Photo - PTI 
महाराष्ट्र

Maratha Reservation : सरकारचं आंदोलनाकडे दुर्लक्ष; मनोज जरांगेंचा मोठा निर्णय, उद्यापासून पाणीही बंद, आमरण उपोषण अधिक तीव्र होणार

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. राज्यभरातून आलेल्या मराठा समाजाच्या मोठ्या उपस्थितीमुळे आंदोलनाला आणखी उर्जा मिळत असताना, जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली. उद्यापासून त्यांनी पाणीही पिणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी आपल्या आमरण उपोषणाची तीव्रता वाढवली आहे.

नेहा जाधव - तांबे

मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील यांनी मुंबईतील आझाद मैदानावर सुरू केलेल्या उपोषणाचा आज तिसरा दिवस आहे. राज्यभरातून आलेल्या मराठा समाजाच्या मोठ्या उपस्थितीमुळे आंदोलनाला आणखी उर्जा मिळत असताना, जरांगे पाटील यांनी आज पत्रकार परिषद घेऊन मोठी घोषणा केली. उद्यापासून त्यांनी पाणीही पिणार नसल्याचे जाहीर केले आहे. त्यांनी आपल्या आमरण उपोषणाची तीव्रता वाढवली आहे.

आमरण उपोषण होणार कडक

मनोज जरांगे यांनी पत्रकार परिषदेत सांगितले, की ''उद्यापासून मी पाणी बंद करणार. सरकार मागण्यांची अंमलबजावणी करत नाहीये. लक्ष देत नाहीये. मी काल आणि परवा पाणी प्यायलो. पण उद्यापासून पाणीही घेणार नाही. आमरण उपोषण अधिक कडक करणार आहे,” असा इशाराही त्यांनी दिला.

तसेच, त्यांनी इतर मराठा आंदोलकांना कोणत्याही प्रकारची कृती करू नका. शांततेत या, शांततेत आंदोलन करायचं आहे. मी मागण्या पूर्ण झाल्याशिवाय मुंबई सोडणार नाही. तुम्हाला आरक्षण देऊनच इथून निघणार असे आवाहन केले.

जरांगे पाटील यांच्या प्रमुख मागण्या

मराठा-कुणबी एकच आहे याचा जिआर काढून अंमलबजावणी करावी.

हैदराबाद आणि सातारा-बाँबे गॅझेटियर लागू करावेत.

ज्याची कुणबी नोंद आहे, त्याचे सगे-सोयरे मराठा म्हणून स्वीकारावे.

मराठा आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत.

कायद्याला धरून टिकाऊ आरक्षण द्यावे.

मनोज जरांगे पाटील यांच्या या नव्या घोषणेमुळे मराठा आरक्षण आंदोलनाची धग आणखी वाढणार असून पुढील काही दिवसांत राज्य सरकार नेमका काय निर्णय घेत आहे याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

मुंबईतील हॉटेल्स, बार, बेकऱ्या FDA च्या रडारवर; ख्रिसमस-नववर्षाच्या तोंडावर तपासणी मोहीम

"आता कोण गप्प आहे?" रुपयाच्या ऐतिहासिक घसरणीनंतर विरोधकांचा मोदी सरकारवर हल्लाबोल

मुंबईच्या हवा गुणवत्तेसाठी 'मानस'ची निर्मिती; IIT Kanpur च्या सहकार्याने BMC राबवणार प्रकल्प

Mumbai : 'कूपर'मध्ये बेडवरून रुग्ण पडण्याच्या घटनांत वाढ; नातेवाईकांकडून सुरक्षेची मागणी

Thane RTO : वाहनधारकांनो तुम्ही HSRP नंबर प्लेट बसवली? 'डेडलाईन' जारी; त्वरित ऑनलाइन अर्जाद्वारे अपॉइंटमेंट घेण्याचे आवाहन