महाराष्ट्र

नागपूर : लग्नावरून परतताना काळाचा घाला, एकाच गावातील 6 जण जागीच ठार

अपघात इतका भीषण होता की क्वालिसचा अक्षरश: चुराडा, संपूर्ण गावावर दु:खाचा डोंगर...

Swapnil S

नागपूरच्या काटोल तालुक्यात शुक्रवारी मध्यरात्री ट्रक आणि क्वालिस कारमध्ये झालेल्या भीषण अपघातात सहा जणांचा जागीच मृत्यू झाला. तर, एकजण जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. काटोल तालुक्यातील सोनखांब आणि चारगावमधील शिवाराजवळ ही घटना घडली. हा अपघात इतका भीषण होता की कारचा अक्षरश: चुराडा झाला.

काटोल तालुक्यातील मेंढेपठार गावातील चंद्रशेखर चिखले यांच्या मुलीचे नागपुरात लग्न होते. या लग्नासाठी गावातील काहीजण नागपूरला गेले होते. रात्री क्वालिसमधून काटोलकडे येत असताना एका भरधाव ट्रकने क्वालिसला धडक दिली. समोरून धडक दिल्याने क्वालिसचा चुराडा झाला व सहा जणांचा मृत्यू झाला.

मृतकांमध्ये दोन सख्या चुलत भावांचाही समावेश आहे. अजय चिखले (वय 45), वैभव चिखले (वय 32), मयूर इंगळे (वय 36), विठ्ठल घोटे (वय 45), सुधाकर मानकर (वय 42), रमेश हेलोंडे (वय 48), अशी मृतांची नावे आहेत. तर, जगदीश ढोसे (वय ४०) जखमी आहेत. सर्व मृतक मेंढेपठार गावाचेच रहिवासी असल्याचे समजते. या घटनेमुळे गावात सर्वत्र शोककळा पसरली आहे.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक