महाराष्ट्र

ओबीसी समाजावर कुठेही अन्याय केला नाही -फडणवीस

Swapnil S

मुंबई : मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आमच्या महायुती सरकारने मराठा समाजाला एकमताने १० टक्के आरक्षण देण्याचा कायदा पारित केला आहे. त्यामुळे मराठा समाजाचा आरक्षणाचा मार्ग आता मोकळा झाला आहे, हे करत असताना आम्ही कुठेही ओबीसींच्या आरक्षणाला धक्का लागू दिला नाही. त्यांचे आरक्षण अबाधित ठेवले, त्यामुळे राज्यभरात संपूर्ण मराठा व ओबीसी समाज गुण्यागोविंदाने नांदेल, याची मला खात्री आहे, असे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

फडणवीस म्हणाले की, “मी मुख्यमंत्री असताना मराठा समाजाला आरक्षण दिले, पण सर्वोच्च न्यायालयाने ते नाकारले होते. आता मागासवर्ग आयोगाने देखील जवळपास अडीच कोटींपेक्षा जास्त घरांमध्ये जाऊन सर्व्हे केला. त्यानंतर त्यांनी अहवाल दिला. त्या अहवालावर आधारित कायदा मंगळवारी पारित करण्यात आला आहे. या सर्वेक्षणासाठी साडेतीन लाख शासकीय कर्मचारी व विविध संस्थांनी काम केले. सारथी योजना, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, यासह सर्व योजनांच्या माध्यमातून सरकार मराठा समाजाच्या विकासासाठी काम करत आहे.”

निवडणुका तोंडावर आल्या म्हणून आरक्षणाचा कायदा झाला, असा आरोप विरोधकांनी केला आहे. यावर फडणवीस म्हणाले की, “विरोधकांची भूमिका ही विरोधीच असते. पण निवडणुका असो किंवा नसो, आम्ही आरक्षणासाठी गेल्या दीड वर्षांपासून यावर काम करत होतो.”

Video : बिनशर्त पाठिंब्यानंतर नरेंद्र मोदी अन् राज ठाकरे पहिल्यांदाच एका व्यासपीठावर, समोर आला पहिला टिझर

Lok Sabha Election 2024 : महाविकास आघाडीला किती जागा मिळणार? शरद पवारांनी वर्तवला अंदाज

पाच वर्षाच्या मुलामुळे बंद होणार दारूची दुकाने, जाणून घ्या संपूर्ण प्रकरण

EVM की खेळणं! BJP नेत्याच्या लहान मुलानं केलं मतदान; नेत्यावर गुन्हा दाखल, अधिकारी निलंबित

Nagpur Shocker : शाळेतून घरी सोडणाऱ्या रिक्षाचालकाने केला १० वीच्या मुलीचा विनयभंग; Video व्हायरल झाल्यावर घटना उघडकीस