महाराष्ट्र

"आपल्याला काय? आपण बोलून मोकळं...", मुख्यमंत्र्याच्या 'त्या' व्हायरल व्हिडिओचा विरोधी नेत्यांनी घेतला समाचार

नवशक्ती Web Desk

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर मोठ्याप्रमाणावर व्हायरल होताना दिसत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात सरकार गंभीर असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे नेहमी सांगतात. त्यांनी मनोज जरांगे पाटील यांना उपोषण सोडण्याचीही विनंती केली. अशात त्यांचा व्हायरल व्हिडिओवरुन त्यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना देखील मोठ्या प्रमाणावर ट्रोल केलं जात आहे.

हा व्हायरल व्हिडिओ मराठा आरक्षणासंदर्भात जी बैठक पारक पडली त्यानंतरचा आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यंत्री अजित पवार आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे या बैठकीनंतर जी पत्रकार परिषद घेतात. त्याच्या सुरुवातीला एकनाथ शिंदे हे आपण फक्त बोलून मोकळ व्हायचं असं बोलताना दिसतात.

नेमका संवाद काय ?

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे - आपल्याला काय? बोलायचं अन् निघून जायचं, बोलून मोकळं व्हायचं.

उपमुख्यमंत्री अजित पवार - हो.....येस

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस - माईक चालू आहे.

अशा संवादाचा व्हिडिओ सर्वत्र व्हायरल होत आहे. यामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह दोन्ही उपमुख्यमंत्री हे मोठ्या प्रमाणावर ट्रोल होताना दिसत आहे. मराठा आरक्षणासंदर्भात जी चर्चा झाली. त्यानंतर पत्रकार परिषदेत भूमिका मांडण्याआधी हा संवाद झाला असं म्हणत मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्यांना ट्रोल केलं जात आहे.

मंगळवारी संभाजी भिडेंनी मनोज जरांगे पाटील यांची भेट घेतली. त्यावेळी त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे लबाड नाहीत, फडणवीस फसवणूक करणार नाहीत आणि अजित पवार काळीज असलेला माणूस आहे, असं जरांगे पाटील यांना सांगितलं होतं. यावेळी त्यांना उपोषण मागे घेण्याची विनंती देखील संभाजी भिडे यांनी केली होती. त्यांचा संदर्भ देत या तिघांना सध्या ट्रोल केलं जात आहे. ठाकरे गटाचे खासदार ओमराजे निंबाळकर यांनी यावरुन मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंसह अजित पवार आणि देवेंद्र फडवीस यांच्यावर टीका केली आहे.

ओमराजे निंबाळकर काय म्हणाले?

मराठा आरक्षणासाठी काल रात्री सर्वपक्षीय बैठक झाल्यानंतर पत्रकार परिषद सुरू होण्यापूर्वी सरकारमधील या तीन प्रमुख नेत्यांतील संवाद तरी पाहा. “आपण बोलून मोकळं व्हायचं” हे त्यांचे उद्गार मराठा आरक्षण प्रश्नी त्यांची असलेली अनास्था दर्शवित आहे.

मराठा आरक्षणासाठी सर्व समाजबांधव पोटतिडकीने राज्यभर आंदोलन करीत आहेत. अनेकांनी अन्नत्याग केला आहे. विविध माध्यमातून राज्य सरकारला जागे करण्याचा प्रयत्न आपला मराठा तरुण करताना दिसतो आहे. तरीही हे सरकार केवळ वेळकाढूपणा करीत आहे. एकीकडे समाज जीवन मरणाचा संघर्ष शांततेच्या माध्यमातून करीत असताना सरकारचे हे ट्रीपल इंजिन बघा किती गांभीर्याने हा विषय घेत आहेत.. आरक्षण देण्याची दानत नसेल तर तसे सांगा पण, किमान जखमेवर मीठ तरी चोळू नका. समाज आता तुमच्याकडे डोळसपणे बघतोय...अशी पोस्ट करत त्यांनी मुख्यमंत्र्यांसह दोन्ही उपमुख्यमंत्र्याना धारेवर धरलं आहे.

त्याच बरोबर विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे आणि विधान सभेचे विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी देखील 'एक्स'वर (ट्विटर) पोस्ट करत या तिन्ही नेत्यांच्या वक्तव्याचा समाजार घेतला आहे.

'मंगलपर्व' आजपासून, मुंबईसह देशात गणेशोत्सवाचा जल्लोष

उद्या हार्बर, ट्रान्स-हार्बर मार्गावर मेगाब्लॉक नाही; मुख्य मार्गावर शनिवारी रात्रकालीन ब्लॉक

'लाडकी बहीण' योजनेचे अर्ज केवळ अंगणवाडी सेविकाच स्वीकारणार

Traffic Update: मुंबई-गोवा महामार्गावर चाकरमान्यांचे हाल सुरूच; गणेश भक्तांची १२ तास रखडपट्टी

निवडणुकीनंतरच महायुतीचा मुख्यमंत्री ठरेल - फडणवीस