महाराष्ट्र

पुण्यात विजेच्या धक्क्यात विद्यार्थ्याचा मृत्यू; मेसमधील वॉटर प्युरिफायरमधून शॉक, विद्यार्थ्यांचा संताप

कृषी महाविद्यालयातील मेसमधील जलशुद्धीकरण यंत्रातून विजेचा धक्का बसल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून दोषींवर कारवाई व सुरक्षाविषयक लेखापरीक्षण करण्याची मागणी होत आहे.

Swapnil S

पुणे : कृषी महाविद्यालयातील मेसमधील जलशुद्धीकरण यंत्रातून विजेचा धक्का बसल्याने एका विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे. या घटनेनंतर विद्यार्थ्यांमध्ये संताप व्यक्त होत असून दोषींवर कारवाई व सुरक्षाविषयक लेखापरीक्षण करण्याची मागणी होत आहे.

चैतन्य कुंडलिक चव्हाण (२३) असे मृत विद्यार्थ्याचे नाव आहे. चैतन्य कृषी महाविद्यालयात ॲग्रीकल्चर बिझनेस मॅनेजमेंट अभ्यासक्रमाच्या प्रथम वर्षात शिक्षण घेत होता. तो ‘ई-मेस’ समितीचा सदस्य होता. १४ मार्च रोजी तो मेसचे कामकाज पाहत असताना जलशुद्धीकरण यंत्र (फिल्टर) व्यवस्थित कार्यरत आहे का, याची पाहणी करत होता. त्यावेळी अचानक यंत्रात वीज प्रवाह उतरल्याने त्याला जोराचा विजेचा धक्का बसला आणि तो बेशुद्ध पडला. मात्र उपचारादरम्यान मंगळवारी त्याचा मृत्यू झाला.

महाविद्यालय परिसरात विद्यार्थ्यांमध्ये संतापाची लाट उसळली असून जबाबदारांवर कठोर कारवाई करावी तसेच संपूर्ण कॅम्पसमध्ये विद्युत सुरक्षेचे लेखापरीक्षण तातडीने करावे, अशी मागणी विद्यार्थ्यांकडून करण्यात येत आहे.

Mumbai : इमारतींना OC मिळण्याची प्रतीक्षाच! अभय योजनेसाठी सुधारित नियमावली आणणार, स्थायी समितीत प्रस्ताव मागे घेतला

"माझ्यावर हसताय?" म्हणत ग्राहकाचे दुकानदारावर चाकूने सपासप वार; मुंबईतील धक्कादायक घटना

एमआयएमच्या नगरसेविकेला धक्का! जात प्रमाणपत्र अवैध असल्याचा समितीचा निर्णय; महापालिकेत राजकीय उलथापालथीची शक्यता

ठाण्यात पाणीटंचाई तीव्र होणार; धरणांतील साठा २८ टक्क्यांवर, मुंबईतील पाणी कपातीचा ठाण्यावर परिणाम?

Pune : सगळ्यांसमोर पतीला मारहाण; अपमानाचा मानसिक धक्का सहन न झाल्याने रिसेप्शनिस्ट महिलेचे टोकाचे पाऊल