(संग्रहित छायाचित्र)
महाराष्ट्र

राहुल गांधींची 'भारत जोडो न्याय यात्रा' आज महाराष्ट्रात; शिवाजी पार्कवर होणार सांगता

महाराष्ट्रात ही यात्रा यशस्वी व्हावी म्हणून काँग्रेस नेत्यांनी कंबर कसली आहे. या यात्रेच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे.

Swapnil S

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी सुरू केलेली ‘भारत जोडो न्याय यात्रा’ मंगळवारपासून महाराष्ट्रात प्रवेश करत आहे. या यात्रेचा समारोप १७ मार्चला शिवाजी पार्कवरील सभेने होणार आहे.

महाराष्ट्रात ही यात्रा यशस्वी व्हावी म्हणून काँग्रेस नेत्यांनी कंबर कसली आहे. या यात्रेच्या माध्यमातून वातावरण निर्मिती करण्याचा काँग्रेसचा प्रयत्न आहे. राहुल गांधी यांची यात्रा मंगळवारी नंदुरबार जिल्ह्यात येईल. त्यानंतर १३ मार्चला धुळे, मालेगाव, १४ मार्चला नाशिक, १५ मार्च रोजी पालघर, ठाणे असा प्रवास करत ही यात्रा १६ मार्च रोजी मुंबईत दाखल होणार आहे. १७ मार्चला भारत जोडो न्याय यात्रेचा समारोप मुंबईतील शिवाजी पार्क मैदानावर होत असून यावेळी इंडिया आघाडीच्या प्रमुख नेत्यांच्या उपस्थितीत लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचे रणशिंग फुंकले जाणार आहे.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती; आमदारकीही वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

'प्रेम नाही तर किमान त्रास तरी देऊ नको'; कुमार सानूंच्या ₹५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यावर विभक्त पत्नी रिटाची संतप्त प्रतिक्रिया

'एका महिन्यात हिंदी शिकली नाहीतर..;दिल्लीतील भाजप नगरसेविकेचा आफ्रिकन नागरिकाला दम, Video व्हायरल; नेटकऱ्यांकडून टीका

गीझरने केला घात? बाथरूममध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; गुदमरून जीव गेल्याचा संशय

महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; राज्यात भाजपच 'नंबर वन' : महाविकास आघाडीची अर्धशतकापर्यंतच मजल