'एआय'ने बनविलेली प्रातिनिधिक प्रतिमा
महाराष्ट्र

रायगडच्या किनाऱ्यांवर तेलतवंगाची भर; कांदळवनांसह सागरी जीवसृष्टी धोक्यात

मान्सूनच्या लाटांसोबत समुद्रातून वाहून येणाऱ्या कचऱ्यात आता तेलतवंगाची भर पडली आहे. रायगड जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर तेलमिश्रित कचरा तसेच वाळूमध्ये मिसळलेले तेलाचे थर आढळून येत आहेत. तेलाचे अवशेष खडक, झुडपे आणि कांदळवनाला चिकटल्याने सागरी जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे.

प्रतिनिधी

धनंजय कवठेकर/अलिबाग

मान्सूनच्या लाटांसोबत समुद्रातून वाहून येणाऱ्या कचऱ्यात आता तेलतवंगाची भर पडली आहे. रायगड जिल्ह्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर तेलमिश्रित कचरा तसेच वाळूमध्ये मिसळलेले तेलाचे थर आढळून येत आहेत. तेलाचे अवशेष खडक, झुडपे आणि कांदळवनाला चिकटल्याने सागरी जैवविविधतेला धोका निर्माण झाला आहे.

मुंबईजवळील मांडवा, आवास, सासवणे आणि नवगाव या किनाऱ्यांवर तेलतवंगाचे प्रमाण अधिक दिसून येत आहे. लाटांसोबत किनाऱ्यावर आलेले तेल वाळूमध्ये मिसळून घट्ट थर तयार होत आहेत. अलिबाग तालुक्यातील नागाव, नांदगाव, रेवदंडा, तसेच मुरूडमधील काशिद, आगरदांडा आणि दिवेआगर किनाऱ्यांवरही कमी-अधिक प्रमाणात तेलतवंग आढळून येत आहे.

दरवर्षी मान्सूनमध्ये रायगडच्या किनाऱ्यांवर तेलकट कचरा आढळत असल्याने केवळ किनारा स्वच्छ करून हा प्रश्न सुटणार नाही. समुद्रात तेलकट पदार्थ नेमके कुठून मिसळत आहेत, याचा शोध घेणे गरजेचे आहे. मुंबई बंदर परिसरातून किंवा दूरच्या समुद्रातून समुद्राच्या प्रवाहासोबत हा कचरा रायगडच्या किनाऱ्यावर येत असण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. किनाऱ्यावर जमा झालेला तेलकट कचरा उचलणे हा तात्पुरता उपाय ठरू शकतो. मात्र, समुद्रात तेलकट पदार्थ मिसळण्याचा स्रोत शोधून त्यावर नियंत्रण आणले नाही, तर दरवर्षी मान्सूनमध्ये ही समस्या पुन्हा उद्भवण्याची शक्यता आहे. त्यामुळे प्रभावित किनाऱ्यांचे नियमित निरीक्षण, समुद्राच्या पाण्याची तपासणी, तेलतवंगाचे नमुने संकलित करून त्याचा स्रोत निश्चित करणे आणि दोषी घटकांवर कठोर कारवाई करणे, अशी मागणी पर्यावरणप्रेमींकडून होत आहे.

कांदळवन आणि जलचरांवर परिणामाची भीती

तेलाचे थर वाळू, खडक आणि कांदळवनावर चिकटल्याने सूक्ष्मजीव, खेकडे, शिंपले, मासे तसेच इतर जलचरांच्या अधिवासावर परिणाम होण्याची भीती आहे. त्याचा परिणाम समुद्रातील अन्नसाखळी आणि भविष्यातील मत्स्यसंपत्तीवरही होऊ शकतो. पर्यावरणप्रेमी डॉ. प्रसाद दाभोळकर यांनीही तेलतवंगामुळे किनारी जैवविविधता आणि अन्नसाखळी धोक्यात येण्याची शक्यता व्यक्त केली आहे. त्यामुळे प्रभावित किनाऱ्यांचे तातडीने सर्वेक्षण करून तेलतवंगाचे नमुने तपासावेत, प्रदूषणाचा स्रोत निश्चित करावा आणि नियमित निरीक्षणाची यंत्रणा उभारावी, अशी मागणी पर्यावरणप्रेमी आणि मच्छिमारांकडून होत आहे.

(संबंधित इंग्रजी बातमी वाचण्यासाठी येथे क्लिक करा.)

Independence Day 2026 : 'सप्तधारा', विकसित भारत अन् आत्मनिर्भरता; पंतप्रधान मोदींच्या भाषणातील महत्त्वाचे मुद्दे, वाचा सविस्तर

Independence Day 2026 : 'वंदे मातरम्'च्या जयघोषाने दुमदुमला लाल किल्ला; ८०व्या स्वातंत्र्यदिनाचा ऐतिहासिक क्षण, Videos

इंडोनेशिया पुन्हा हादरले! ७.७ तीव्रतेच्या भूकंपानंतर त्सुनामीचा हाय अलर्ट; VIDEO

'आपण सोशल मीडियावर कमी पडतोय'; रविंद्र चव्हाण यांच्याकडून नेते, कार्यकर्त्यांना कानपिचक्या

मुंबई अग्निशमन दलाच्या १३ जवानांना राष्ट्रपतींचे शौर्यपदक