उद्धव ठाकरे, देवेंद्र फडणवीस (डावीकडून) 
महाराष्ट्र

ठाकरे गटाकडून ‘देवा भाऊं’शी लाडीगोडी; गडचिरोलीच्या विकास योजनांबाबत प्रशंसा

२०१९ मध्ये भाजप आणि शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गटाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर कौतुक केले.

Swapnil S

मुंबई : २०१९ मध्ये भाजप आणि शिवसेनेतील फुटीनंतर पहिल्यांदाच शिवसेना ठाकरे गटाने महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे जाहीर कौतुक केले. नक्षलग्रस्त गडचिरोली जिल्ह्याला स्टील सिटीमध्ये बदलण्याच्या त्यांच्या प्रयत्नांसाठी ठाकरे गटाने त्यांचे कौतुक केले. पक्षाचे मुखपत्र 'सामना'मधील संपादकीयमध्ये फडणवीस यांना 'देवा भाऊ' म्हणून संबोधले गेले असून त्यांनी विदर्भातील महाराष्ट्राच्या सर्वात दुर्गम जिल्ह्याला नवीन वर्षाच्या पूर्वसंध्येला भेट देऊन विकासाचा अध्याय सुरू केल्याचे म्हटले आहे.

महाराष्ट्राच्या पूर्वेकडील सीमेजवळ वसलेल्या गडचिरोलीला राज्याचा शेवटचा जिल्हा असेही म्हणतात. दोन दिवसांपूर्वी गडचिरोलीच्या दौऱ्यात मुख्यमंत्र्यांनी नक्षलवाद्यांच्या शरणागतीच्या वाढत्या संख्येमुळे आणि त्यांच्या चळवळीला नवीन भरती मिळण्यात अडचण येत असल्याने लवकरच महाराष्ट्र नक्षलमुक्त होईल, असे विधान केले. फडणवीस या जिल्ह्यात काहीतरी नवीन करतील आणि तेथील आदिवासींच्या जीवनात सकारात्मक बदल घडवतील, असे दिसते, असे सामनाच्या संपादकीयमध्ये म्हटले आहे.

ठाणे स्थानकाच्या विस्तारीकरणाला प्रारंभ; १५ डब्यांच्या लोकलसाठी फलाटांची लांबी वाढविण्याचे काम युद्धपातळीवर सुरू

“२० वर्षांपासूनचं स्वप्न अखेर साकार; तुम्ही फक्त वर्ल्डकप नव्हे, तर..."; विश्वविजेत्या भारतीय संघासाठी मिताली राजची इमोशनल पोस्ट

इतिहास रचला! भारताच्या महिला क्रिकेटपटूंनी प्रथमच विश्वचषक जिंकला; दक्षिण आफ्रिकेला चारली धूळ

कोइंबतूर एअरपोर्टजवळील धक्कादायक घटना; कॉलेजच्या विद्यार्थिनीचे अपहरण करून तिघांनी केला गँगरेप; प्रियकरालाही केली मारहाण

'कोणीतरी मराठी अभिनेत्री आहे, पण जोपर्यंत रंगेहाथ पकडत नाही...'; गोविंदाच्या अफेअरच्या चर्चांवर नेमकं काय म्हणाली पत्नी सुनीता?