ANI
महाराष्ट्र

राजकीय आकसापोटी कुटुंबीयांची सुरक्षा काढली - एकनाथ शिंदे

तुमच्याकडे सत्ता आहे का? मी हवेत बोलत नाही. बंडखोरी करणाऱ्यांनी आपली आमदारकी वाचवा. मी देवेंद्र फडणवीस यांना सांगेन की,

वृत्तसंस्था

उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील महाविकास आघाडी सरकारने बंडखोर शिवसेना आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याचा दावा शिवसेनेचे बंडखोर आमदार एकनाथ शिंदे यांनी केला आहे. त्यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महाराष्ट्राचे गृहमंत्री आणि डीजीपी महाराष्ट्र यांना पत्र लिहून '38 आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा राजकीय आकसापोटी काढून घेण्यात आली आहे.' यासाठी तुम्ही जबाबदार असल्याचे पत्रात म्हटले आहे.'

बंडखोर आमदारांच्या कुटुंबीयांची सुरक्षा काढून घेतल्याच्या एकनाथ शिंदे यांच्या आरोपावर शिवसेना नेते संजय राऊत म्हणाले, आम्ही कोणाचीही सुरक्षा काढलेली नाही, लोकांमध्ये नाराजी आहे. तुमच्याकडे सत्ता आहे का? मी हवेत बोलत नाही. बंडखोरी करणाऱ्यांनी आपली आमदारकी वाचवा. मी देवेंद्र फडणवीस यांना सांगेन की, या गोंधळातून बाहेर राहा, नाहीतर ते अडकतील.

Maharastra Rain: मुसळधार पावसाची शक्यता; ऑरेंज अलर्ट जारी

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

लडाख आंदोलनाला हिंसक वळण; भाजपचा कॉँग्रेसवर कटाचा आरोप

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून

मुंब्रा-कळवा भागात पाणीटंचाई; पाणीटंचाईबाबत महापालिका मुख्यालयावर धडक; जितेंद्र आव्हाडांनी अधिकाऱ्यांना विचारला जाब