ANI
ANI
महाराष्ट्र

शिंदे सरकारची शेतकऱ्यांसाठी दिलासादायक घोषणा

वृत्तसंस्था

राज्य सरकारच्या आज पार पडलेल्या मंत्रीमंडळ बैठकीमध्ये अनेक निर्णयांवर आणि मुद्द्यांवर चर्चा झाल्याचे समजते. यामध्ये पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती व्यतिरिक्त एक महत्वाची घोषणा करण्यात आली ती म्हणजे कर्जाची नियमित परतफेड करणाऱ्या शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्याचा निर्णय घेण्यात आला. या निर्णयाचा लाखो शेतकऱ्यांना फायदा होणार आहे.

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना काही अटींमुळे नियमित पीक कर्ज फेडण्यास प्रोत्साहन दिले जाईल, हे लक्षात घेऊन लवकरच अशा पूर आणि अतिवृष्टीतील शेतकऱ्यांना या योजनेतून वगळले जाणार नाही, असे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. निवेदनानुसार, जाचक अटी रद्द करून प्रामाणिकपणे पैसे देणाऱ्या राज्यातील शेतकऱ्यांना 50 हजार रुपयांचे अनुदान देण्यास सरकार कटिबद्ध असल्याचे शिंदे यांनी स्पष्ट केले.

धक्कादायक! अर्धनग्न केलं अन् झाडाला बांधून केली अमानुष मारहाण...साताऱ्यातील जखमी युवकाचा उपचारादरम्यान मृत्यू

पुण्यासह सांगली,मिरज,कोल्हापूर आणि सोलापूर रेल्वे स्थानके बॉम्बने उडवून देण्याची धमकी देणाऱ्याला पोलीसांनी ठोकल्या बेड्या

सूनेनं केली सासऱ्याच्या घरात चोरी, मामेभावासोबत केलं परफेक्ट प्लॅनिंग, तीन लाखांची रोकड चोरली

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग