महाराष्ट्र

श्रावणबाळ योजनेतील दिव्यांगाना दिलासा! पाच लाख लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात वाढ; दीड हजाराऐवजी मिळणार अडीच हजार रुपये

राज्यात संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दिव्याग लाभार्थ्यांना दीड हजार रुपये अर्थसहाय्य मिळत होते, त्यात एक हजारांची वाढ करत आता अडीच हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे.

Swapnil S

मुंबई : राज्यात संजय गांधी निराधार, श्रावणबाळ योजनेतील दिव्यांग लाभार्थ्यांच्या अर्थसहाय्यात हजार रुपयांची वाढ करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. दिव्याग लाभार्थ्यांना दीड हजार रुपये अर्थसहाय्य मिळत होते, त्यात एक हजारांची वाढ करत आता अडीच हजार रुपये अर्थसहाय्य मिळणार आहे. यासाठी ५७० कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली बुधवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत याला मंजुरी देण्यात आली आहे. राज्य सरकारच्या या निर्णयामुळे सुमारे पाच दिव्यांगाना राज्य सरकारचा दिलासा मिळाला आहे.

राज्यातील संजय गांधी निराधार अनुदान योजनेंतर्गत निराधार पुरुष, महिला, अनाथ मुले, दिव्यांगातील सर्व प्रवर्ग, निराधार विधवा आदींना दरमहा पंधराशे रुपये अर्थसहाय्य दिले जाते.

सध्या संजय गांधी निराधार अनुदान योजनेत ४ लाख ५० हजार ७०० आणि श्रावणबाळ योजनेत २४ हजार ३ दिव्यांग लाभार्थी आहेत. या लाभार्थ्यांना आता दरमहा अडीच हजार रुपये अर्थसहाय्य देण्यास बुधवारी मान्यता देण्यात आली. हे अनुदान ऑक्टोबर २०२५ पासून देण्यात येणार आहे.

संविधान हातात घेऊन डी. के. शिवकुमार यांनी घेतली कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदाची शपथ; डॉ. जी. परमेश्वर नवे उपमुख्यमंत्री, १३ मंत्र्यांचा मंत्रिमंडळात समावेश

ठाण्यात २४ तास पाणीपुरवठा बंद; नागरिकांना पाणी जपून वापरण्याचे आवाहन

Mumbai : प्रतीक्षा संपली! मृणालताई गोरे उड्डाणपूल ६ जूनपासून सुरू; पश्चिम द्रुतगती महामार्गावरील ट्रॅफिक कमी होण्याची शक्यता

Mumbai Rain : पावसाच्या हलक्या सरींमध्येच अंधेरी सबवे पाण्याखाली; BMC च्या मान्सूनपूर्व तयारीवर प्रश्नचिन्ह

शरीरावर ९१ जखमा, ७ बरगड्या मोडल्या; दीड वर्षांच्या चिमुकल्यावर आईच्या लिव्ह-इन पार्टनरकडून अमानुष अत्याचार