freepik
महाराष्ट्र

सरकारी मेडिकल कॉलेजमध्ये मानसोपचार तज्ज्ञ नेमणार; राज्य शासनाचा निर्णय

विद्यार्थ्यांना येणारे वैफल्य व अन्य मानसिक तणावापासून मुक्ती मिळण्यासाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात मानसोपचार तज्ज्ञ नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने पहिल्यांदाच घेतला आहे.

Swapnil S

मुंबई : विद्यार्थ्यांना येणारे वैफल्य व अन्य मानसिक तणावापासून मुक्ती मिळण्यासाठी सरकारी वैद्यकीय महाविद्यालयात मानसोपचार तज्ज्ञ नेमण्याचा निर्णय राज्य सरकारने पहिल्यांदाच घेतला आहे.

राज्य सरकारच्या वैद्यकीय शिक्षण खात्याने प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. सध्याच्या डिजीटल युगात विद्यार्थ्यांमध्ये शारीरिक व मानसिक तणावात वाढ झाली आहे. अनेकदा विद्यार्थी वैफल्यग्रस्त होतात. ते आपल्या भावनाही व्यक्त करत नाहीत. त्यामुळे आत्महत्येचे प्रमाण विद्यार्थ्यांमध्ये वाढत चालले आहे. या समस्येवर निदान होऊन त्यांना समुपदेशन मिळाल्यास विद्यार्थ्यांच्या जीवनात पुन्हा आनंद येऊ शकतो. मानसोपचार विभागाचे प्राध्यापक, मानसोपचार विभागाचे सहाय्यक प्राध्यापक व अधीक्षक यांची तीन सदस्य समिती राज्यातील प्रत्येक वैद्यकीय शिक्षण संस्थेवर देखरेख करेल. यात विशेष हेल्पलाईन, नामवंत तज्ज्ञांचे मार्गदर्शन, व्याख्यान, शिक्षक व विद्यार्थ्यांसोबत संवाद आदी उपक्रम हाती घेतले जातील. दोन समुपदेशकांची दरमहा ३० हजार वेतनावर कंत्राटी पद्धतीने नेमणूक केली जाणार आहे, असे आदेशात म्हटले आहे.

कोलकात्यात बांधकामाधीन गोदामाचे छत कोसळले; ३ ठार, अनेक कामगार ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

Mumbai : महापौरांसमोरच मॅनहोलमध्ये पडला सफाई कर्मचारी; अधिकाऱ्यांना निलंबनाचा इशारा, Video

'सत्य सांगणं इतकं कठीण झालंय का?' केतन अग्रवाल प्रकरणावर हिना खानची प्रतिक्रिया; म्हणाली, "त्याचा जीव वाचला असता...

प्रियकरासोबत पळून गेल्यास कुटुंबाची बदनामी झाली असती; मग होणाऱ्या नवऱ्यालाच दरीत ढकललं, केतन अग्रवाल प्रकरणात नवी माहिती

Mumbai : मुसळधार पावसात धावत्या लोकलमध्ये क्षुल्लक वाद विकोपाला; २२ वर्षीय तरुणाची चाकू भोसकून हत्या, आरोपी फरार