उद्धव ठाकरे संग्रहित छायाचित्र
महाराष्ट्र

ठाकरेंच्या शिवसेनेचे जिल्हास्तरावर नियंत्रक; स्थानिक स्वराज्य संस्थांसाठी रणनीती

पक्षाला लागलेली गळती भरून काढणे, राज्यात पक्ष बांधणी, जिल्हास्तरावर लोकांच्या समस्या जाणून घेत त्या समस्यांचे निवारण करणे यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कंबर कसत आहे.

गिरीश चित्रे

पक्षाला लागलेली गळती भरून काढणे, राज्यात पक्ष बांधणी, जिल्हास्तरावर लोकांच्या समस्या जाणून घेत त्या समस्यांचे निवारण करणे यासाठी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांची शिवसेना कंबर कसत आहे. या कामांसाठी ठाकरेंच्या शिवसेनेतर्फे जिल्हापातळीवर नियंत्रकाची नियुक्ती करण्यात येत आहे. आतापर्यंत २८ नियंत्रकांची नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेनेतील वरिष्ठ नेत्याने सांगितले. दरम्यान, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पक्ष संघटना अधिक मताधिक्याने निवडून येण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी रणनीती आखली आहे.

विधानसभा निवडणुकीत दारुण पराभवाला सामोरे जावे लागल्याने आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत पुन्हा एकदा उभारी घेण्यासाठी ठाकरेंची शिवसेना कंबर कसत आहे. राज्यात पुन्हा एकदा शिवसेनेचे वर्चस्व प्रस्थापित करण्यासाठी ठाकरेंच्या शिवसेनेने जिल्हास्तरावर नियंत्रक नेमण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी सोशल मीडियावर जाहिरात प्रसिद्ध करण्यात आली आहे. जाहिरात प्रसिद्ध झाल्यापासून शेकडो अर्ज प्राप्त झाले असून आतापर्यंत २८ नियंत्रकाची नियुक्ती करण्यात आल्याचे शिवसेनेतील वरिष्ठ नेत्याने सांगितले.

एकनाथ शिंदे यांनी उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला जय महाराष्ट्र करत स्वतःची शिवसेना स्थापन केली. एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेला केंद्रीय निवडणूक आयोगाने मान्यता दिल्याने शिंदेंच्या शिवसेनेकडे धनुष्यबाण चिन्ह गेले आहे. त्यामुळे राज्यातील अनेक जिल्ह्यांतील लोकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे की ठाकरेंच्या शिवसेनेचे नेमके चिन्ह कोणते. ठाकरेंच्या शिवसेनेचे चिन्ह मशाल असून राज्यातील प्रत्येक घरात मशाल पोहोचवण्याची जबाबदारी नियंत्रकाची असणार आहे.

नियंत्रकाचे असे असेल काम

जिल्हापातळीवर पक्ष बांधणी, मतदारांच्या अपेक्षा, विधानसभा मतदारसंघांत काय घडतंय आणि पक्षाचे चिन्ह प्रत्येक घरी पोहोचविणे, ही कामे नियंत्रकांची असणार आहेत.

Mumbai : मनोरी प्रकल्पाला CRZ ची मंजुरी; समुद्राचे खारे पाणी गोडे करणाऱ्या प्रकल्पाला गती

सिडकोच्या ताब्यातील स्थानके मध्य रेल्वेकडे हस्तांतरित होणार; २० वर्षांनंतर ऐतिहासिक निर्णय, नवी मुंबईतील रेल्वे प्रवाशांना दिलासा

राज्यात बोगस दातांच्या डॉक्टरांना बसणार आळा; महाराष्ट्र राज्य दंत परिषदेकडून मराठी नोंदणी प्रमाणपत्रे जारी

Mumbai : जुन्या इमारतींच्या पुनर्विकास प्रकल्पातील रहिवाशांना दिलासा; तक्रार निवारण व्यवस्थापन प्रणाली विकसित

Thane : प्रक्रिया केलेले पाणी महापालिका विकणार; पाणीटंचाईसह अवकाळी पावसाच्या दुहेरी संकटासाठी पालिका सज्ज