महाराष्ट्र

चौथ्या टप्प्याच्या प्रचाराची रणधुमाळी संपली,राज्यातील ११ मतदारसंघात सोमवारी मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी सहा वाजता संपली. महाराष्ट्रातील ११ जागांसह ९६ मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे.

Swapnil S

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी सहा वाजता संपली. महाराष्ट्रातील ११ जागांसह ९६ मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे.

मावळ, पुणे, शिर्डीसह ११ मतदारसंघात २९८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, अमोल कोल्हे, सुजय विखे-पाटील आदी मान्यवरांचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यात राज्यातील २.२८ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान होणार असलेले ११ मतदारसंघ मध्य मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. या ठिकाणी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नंदुरबार, जळगाव, रावेर, मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आदी मतदारसंघात मतदान होणार आहे. १३ मे रोजी होणाऱ्या ४ थ्या टप्प्यात देशातील १० राज्यात ९६ मतदारसंघात मतदान होईल. यात १७१७ उमेदवार रिंगणात आहेत.

Bhiwandi Building Collapse : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक; मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; ९ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

VIDEO : पत्नीला दुसऱ्या पुरुषासोबत पाहिलं, पतीने भररस्त्यात पट्टा काढला अन्...

ठाणे-घोडबंदर मार्गावरील खराब रस्त्यांची दखल; पालिकेला वाहतूक विभागाची नोटीस, काशिमीरा शाखेची कारवाई

केडीएमसीचे दोन कर्मचारी निलंबित; फेरीवाला निर्मूलन मोहिमेत हलगर्जी भोवली