महाराष्ट्र

चौथ्या टप्प्याच्या प्रचाराची रणधुमाळी संपली,राज्यातील ११ मतदारसंघात सोमवारी मतदान

लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी सहा वाजता संपली. महाराष्ट्रातील ११ जागांसह ९६ मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे.

Swapnil S

मुंबई : लोकसभा निवडणुकीच्या चौथ्या टप्प्याच्या प्रचाराची रणधुमाळी शनिवारी सायंकाळी सहा वाजता संपली. महाराष्ट्रातील ११ जागांसह ९६ मतदारसंघात १३ मे रोजी मतदान होणार आहे.

मावळ, पुणे, शिर्डीसह ११ मतदारसंघात २९८ उमेदवार रिंगणात आहेत. त्यात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे, पंकजा मुंडे, अमोल कोल्हे, सुजय विखे-पाटील आदी मान्यवरांचा समावेश आहे. चौथ्या टप्प्यात राज्यातील २.२८ कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. मतदान होणार असलेले ११ मतदारसंघ मध्य मराठवाडा, उत्तर महाराष्ट्र, पश्चिम महाराष्ट्रातील आहेत. या ठिकाणी सकाळी ७ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत मतदान होणार आहे, असे राज्य निवडणूक आयोगाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले. नंदुरबार, जळगाव, रावेर, मराठवाड्यात औरंगाबाद, बीड, मावळ, पुणे, शिरूर, अहमदनगर, शिर्डी आदी मतदारसंघात मतदान होणार आहे. १३ मे रोजी होणाऱ्या ४ थ्या टप्प्यात देशातील १० राज्यात ९६ मतदारसंघात मतदान होईल. यात १७१७ उमेदवार रिंगणात आहेत.

दुबईत अडकलेल्या भारतीयांना दिलासा; मध्यपूर्व तणावानंतर उड्डाणाला सुरुवात, प्रवासी मुंबईत दाखल, Video

मध्यपूर्व संघर्षानंतर महाराष्ट्र सरकारकडून व्हॉट्सॲप हेल्पलाइन सुरू; उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार म्हणाल्या, "नागरिकांच्या सुरक्षेला प्राधान्य...

"कृपया मला मदत करा…"; विशाखा सुभेदारांचा मुलगा अडकला कुवेतमध्ये, अभिनेत्रीला अश्रू अनावर; Video

Mumbai : लोकलला बांधून नेलं होळीचं झाड; विरार ते माहीम जल्लोषमय प्रवास, कोळी बांधवांची अनोखी परंपरा चर्चेत; Video

लग्नाच्या वाटेतील अडथळा ठरला लिव्ह-इन पार्टनर; अभिनेत्रीने प्रियकरासोबत रचला खुनाचा डाव, तब्बल १२ दिवस…