महाराष्ट्र

एसटी प्रवाशांची आंबेतला फेरी बोटीतून वाहतूक

प्रतिनिधी

ठाणे : रत्नागिरीतील आंबेत पूल गेल्या आठवड्यापासून अवजड वाहतुकीसाठी बंद असल्याने एसटीच्या रत्नागिरी विभागातील दापोली व मंडणगड आगाराच्या बसेसना या पुलावरुन जाण्याची बंदी केली आहे. त्यामुळे एसटीच्या प्रवाशांना फेरीबोटीतून घेऊन जाण्याची परवानगी दापोलीतील सुवर्णदूर्ग शिपिंग अँड मरीन सर्व्हिसेस प्रायव्हेट लिमिटेड यांना देण्यात आली. रोरो आणि फेरीबोटीतून दररोज ३० फेऱ्या होतात, अशी माहिती दापोलीतील एसटीतील सूत्रांनी दिली.

आंबेत पूल मोठ्या दुरुस्तीमुळे बंद ठेवल्याने ठाणे, बोरिवली आणि मुंबई या मार्गावरील एसटी प्रवाशांवर फेरीबोट आणि रो-रो बोटमधून प्रवास करण्याची वेळ आली आहे. कारण, एसटीच्या रत्नागिरी विभागातील दापोली आणि मंडण आगाराच्या बसगाड्यांनाही बंदी केली. राज्य शासन अधिसूचना ट्रान्स शिपमेंट २३ नुसार महाराष्ट्र मेरीटाईम बोर्डाच्या लहान बंदरांच्या हद्दीत चालणाऱ्या फेरीबोट आणि रोरो बोटीमधून वाहतूक करण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. फेरीबोट आणि बोटीमधून पाळीव प्राणी, वाहने आणि माल इत्यादींनाही परवानगी देण्यात आली.

"तो मुलाच्या बर्थडे पार्टीचा प्लॅन करत होता, आता आम्ही त्याच्या अंत्यसंस्काराची योजना आखतोय": पूंछ हल्ल्यातील शहीद जवानाचे नातलग

जीवघेणा रेल्वे प्रवास; सर्वाधिक महसूल गोळा करणाऱ्या रेल्वेला प्रवाशांच्या जीवाचे मोल शून्य

पत्नीची हत्या करून पतीचे पलायन; अपघाताचा बनाव करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न, आरोपी सासूला अटक

तिसऱ्या टप्प्यातील प्रचार संपला,मंगळवारी दिग्गजांचे भवितव्य ठरणार!

पत्रकाराच्या नावाने खंडणी उकळणाऱ्या भाजप पदाधिकाऱ्याविरुद्ध गुन्हा