मुंबई

अहमदाबाद-मुंबई ५ तास २१ मिनिटांत पार; 'वंदे भारत'ची चाचणी यशस्वी

अहमदाबाद-मुंबई सेंट्रल दरम्यान २० डब्यांच्या वंदे भारत एक्स्प्रेसची शुक्रवारी यशस्वी चाचणी झाली.

कमल मिश्रा

प्रतिनिधी

मुंबई : अहमदाबाद-मुंबई सेंट्रल दरम्यान २० डब्यांच्या वंदे भारत एक्स्प्रेसची शुक्रवारी यशस्वी चाचणी झाली. ताशी १३० किमी वेगाने धावलेल्या या वंदे भारत एक्स्प्रेसने अहमदाबाद-मुंबई हे अंतर अवघ्या ५ तास २१ मिनीटात पार केले. ही चाचणी रिसर्च डिझाईन ॲॅण्ड स्टँडर्ड‌्स‌ ऑर्गनायझेशनच्या मार्गदर्शनाखाली पार पडली. सध्याची १६ डब्यांची वंदे भारत एक्स्प्रेस अहमदाबाद-मुंबई सेंट्रल हे अंतर ५ तास २५ मिनिटे घेते.

अहमदाबाहून सकाळी ७ वाजता ही वंदे भारत सुटून दुपारी १२.२१ वाजता मुंबई सेंट्रलला पोहोचली. ही चाचणी यशस्वी ठरल्याचे सूत्रांनी सांगितले. मात्र, याचा अंतिम अधिकृत अहवाल यायचा आहे. या चाचणीत काही किरकोळ बाबी आढळल्या आहेत. मात्र त्या फारशा गंभीर नाहीत. स्थानिक अधिकाऱ्यांसोबत चर्चा करून त्याची सोडवणूक केली जाईल, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.

आता २० डब्यांची वंदे भारत सुरू केल्यास आणखीन २५ टक्के प्रवाशांची सोय होऊ शकेल. सध्याच्या १६ डब्यांच्या वंदे भारतमध्ये ११२८ प्रवासी बसतात. त्यात दोन प्रथम वर्गाचे डबे आहेत.

इटलीत दोन भारतीयांची गोळ्या झाडून हत्या; वैशाखी उत्सवादरम्यान गुरुद्वाराबाहेर हल्ला

'बिग बॉस मराठी ६'ची ट्रॉफी तन्वी कोलतेच्या नावावर; राकेश बापट उपविजेता

घर बसल्या पार्किंगची सुविधा तूर्तास कागदावरच; मोबाईल अ‍ॅप विकसित करण्यास मुहूर्त मिळेना; अखेर पुन्हा नव्याने निविदा काढणार

Thane : नगरसेवकांना निवृत्तीवेतन द्यावे; माजी महापौर मीनाक्षी शिंदे यांची सूचना; सोमवारच्या महासभेत येणार चर्चेला

दुसऱ्यांदा आई होणार दीपिका पदुकोण? लेक दुआच्या 'क्यूट' पोस्टमुळे रंगल्या चर्चा