मुंबई

राज्यात २८ मेला साजरा होणार 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन'; मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची घोषणा

महाराष्ट्रामध्ये २८ मे हा स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस आता 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ म्हणून साजरा केला जाणार

प्रतिनिधी

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली आहे. महाराष्ट्रामध्ये आता २८ मे हा दिवस 'स्वातंत्र्यवीर गौरव दिन' म्हणून साजरा केला जाणार आहे. यादिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांचा जन्मदिवस आहे. यानिमित्ताने मुख्यमंत्र्यांनी ट्विट करत ही घोषणा केली. यावेळी विविध कार्यक्रमाचे आयोजन केले जाणार असल्याचेही त्यांनी सांगितले आहे.

मुख्यमंत्र्यांनी ट्विटमध्ये म्हंटले आहे की, "देशाच्या स्वातंत्र्यासाठी, राष्ट्रउन्नतीसाठी स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे मोठे योगदान आहे. त्यांची देशभक्ती, धैर्य, प्रगतीशील विचारांना पुढे घेऊन जाण्यासाठी, त्या माध्यमातून त्यांना अभिवादन करण्यासाठी ‘स्वातंत्र्यवीर गौरव दिन’ साजरा करण्याची मागणी उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली होती. या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकरांच्या विचारांचा प्रचारप्रसार करण्यासाठी विविध कार्यक्रम आयोजित केले जाणार आहेत." अशी माहिती त्यांनी दिली आहे.

Manikrao Kokate : माणिकराव कोकाटेंच्या शिक्षेला स्थगिती; आमदारकीही वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून मोठा दिलासा

'प्रेम नाही तर किमान त्रास तरी देऊ नको'; कुमार सानूंच्या ₹५० कोटींच्या मानहानीच्या दाव्यावर विभक्त पत्नी रिटाची संतप्त प्रतिक्रिया

'एका महिन्यात हिंदी शिकली नाहीतर..;दिल्लीतील भाजप नगरसेविकेचा आफ्रिकन नागरिकाला दम, Video व्हायरल; नेटकऱ्यांकडून टीका

गीझरने केला घात? बाथरूममध्ये आढळले पती-पत्नीचे मृतदेह; गुदमरून जीव गेल्याचा संशय

महायुतीची मुसंडी, मविआची घसरगुंडी; राज्यात भाजपच 'नंबर वन' : महाविकास आघाडीची अर्धशतकापर्यंतच मजल