मुंबई

अबब... विक्रोळीत ५ कोटींची भिंत; नाल्याशेजारी १७५ मीटर लांब आरसीसी बांधकाम

दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटनांपासून बचाव व पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी संरक्षक भिंत बांधण्यात येत असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : नाल्याशेजारी राहणाऱ्यांना पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी भांडूप येथील इंदिरा नगर, टागोर नगर तर विक्रोळी पूर्वेकडील ९० फूट रस्त्यापासून संतोषी माता नाल्याच्या दक्षिण बाजूस आरसीसी बांधकाम असलेली संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. यामुळे दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटनांपासून बचाव व पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी संरक्षक भिंत बांधण्यात येत असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

कमी दरात काम करणाऱ्या कंत्राटदारांवर मेहरबान, सौंदर्यीकरणावर ७०० कोटींचा खर्च करणारी मुंबई महापालिका नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यात आता संरक्षक भिंत बांधण्यासाठी तब्बल ४ कोटी ८२ लाख ३५ हजार ८७५ रुपये खर्चणार असल्याने कंत्राटदारावर पालिका मेहरबान अशी टीका विरोधकांनी केली आहे. मुबलक पाणी, दर्जेदार आरोग्य सुविधा या करदात्या मुंबईकरांच्या माफक अपेक्षा. मात्र कंत्राटदारांवर मेहरबान असलेली मुंबई महापालिका संरक्षक भिंत बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चणार असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. भांडूप येथील इंदिरा नगर, टागोर नगर व विक्रोळी पूर्वेकडील ९० फूट रस्त्यापासून संतोषी माता नाल्याच्या दक्षिण बाजूस आरसीसी बांधकाम असलेली संरक्षक भिंत बांधण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. १७५ मीटर लांब व ९ मीटर रूंद नाल्याशेजारी संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे.

मालमत्ता कर न भरणे पडले महागात; ६ हजार ९२२ मालमत्तांवर अटकावणी ४८३ वर जप्तीची कारवाई; २१० मालमत्तांच्या लिलावाची प्रक्रिया प्रस्तावित

Maharashtra Weather : राज्यात हवामान बदलाची चिन्हे; कडाक्याच्या उन्हानंतर 'या' जिल्ह्यांत वादळी पावसाचा इशारा

Navi Mumbai : एलपीजी टंचाईमुळे सानपाडा गॅस एजन्सीसमोर नागरिकांची झुंबड; सिलिंडरसाठी लांबच लांब रांगा; Video

Mumbai : अधिवेशनादरम्यान विधानभवनाला बॉम्बने उडवून देण्याची धमकी; सुरक्षा यंत्रणा सतर्क

ठाणे होणार कचरामुक्त; पहिला प्रकल्प गायमुख येथे; १०० मेट्रीक टन ओल्या कचऱ्यापासून खतनिर्मिती