मुंबई

अबब... विक्रोळीत ५ कोटींची भिंत; नाल्याशेजारी १७५ मीटर लांब आरसीसी बांधकाम

दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटनांपासून बचाव व पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी संरक्षक भिंत बांधण्यात येत असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : नाल्याशेजारी राहणाऱ्यांना पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी भांडूप येथील इंदिरा नगर, टागोर नगर तर विक्रोळी पूर्वेकडील ९० फूट रस्त्यापासून संतोषी माता नाल्याच्या दक्षिण बाजूस आरसीसी बांधकाम असलेली संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. यामुळे दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटनांपासून बचाव व पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी संरक्षक भिंत बांधण्यात येत असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

कमी दरात काम करणाऱ्या कंत्राटदारांवर मेहरबान, सौंदर्यीकरणावर ७०० कोटींचा खर्च करणारी मुंबई महापालिका नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यात आता संरक्षक भिंत बांधण्यासाठी तब्बल ४ कोटी ८२ लाख ३५ हजार ८७५ रुपये खर्चणार असल्याने कंत्राटदारावर पालिका मेहरबान अशी टीका विरोधकांनी केली आहे. मुबलक पाणी, दर्जेदार आरोग्य सुविधा या करदात्या मुंबईकरांच्या माफक अपेक्षा. मात्र कंत्राटदारांवर मेहरबान असलेली मुंबई महापालिका संरक्षक भिंत बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चणार असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. भांडूप येथील इंदिरा नगर, टागोर नगर व विक्रोळी पूर्वेकडील ९० फूट रस्त्यापासून संतोषी माता नाल्याच्या दक्षिण बाजूस आरसीसी बांधकाम असलेली संरक्षक भिंत बांधण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. १७५ मीटर लांब व ९ मीटर रूंद नाल्याशेजारी संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे.

Delhi Riots 2020 : गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा हत्येप्रकरणी माजी AAP नगरसेवक ताहीर हुसेनला जन्मठेप

Bhiwandi Building Collapse : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक; मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; ९ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

August 2026 Dry Days : ऑगस्टमध्ये पार्टीचा प्लॅन करताय? 'या' २ दिवशी बंद राहणार दारूची दुकाने

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! जादा सामानासाठी आता रांगेत उभं राहायची गरज नाही; जाणून घ्या नवे नियम