मुंबई

अबब... विक्रोळीत ५ कोटींची भिंत; नाल्याशेजारी १७५ मीटर लांब आरसीसी बांधकाम

दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटनांपासून बचाव व पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी संरक्षक भिंत बांधण्यात येत असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

Swapnil S

मुंबई : नाल्याशेजारी राहणाऱ्यांना पावसाळ्यात उद्भवणाऱ्या पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी भांडूप येथील इंदिरा नगर, टागोर नगर तर विक्रोळी पूर्वेकडील ९० फूट रस्त्यापासून संतोषी माता नाल्याच्या दक्षिण बाजूस आरसीसी बांधकाम असलेली संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे. यामुळे दरड कोसळून होणाऱ्या दुर्घटनांपासून बचाव व पूरस्थितीचा सामना करावा लागू नये, यासाठी संरक्षक भिंत बांधण्यात येत असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला आहे.

कमी दरात काम करणाऱ्या कंत्राटदारांवर मेहरबान, सौंदर्यीकरणावर ७०० कोटींचा खर्च करणारी मुंबई महापालिका नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. त्यात आता संरक्षक भिंत बांधण्यासाठी तब्बल ४ कोटी ८२ लाख ३५ हजार ८७५ रुपये खर्चणार असल्याने कंत्राटदारावर पालिका मेहरबान अशी टीका विरोधकांनी केली आहे. मुबलक पाणी, दर्जेदार आरोग्य सुविधा या करदात्या मुंबईकरांच्या माफक अपेक्षा. मात्र कंत्राटदारांवर मेहरबान असलेली मुंबई महापालिका संरक्षक भिंत बांधण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चणार असल्याची टीका विरोधकांनी केली आहे. भांडूप येथील इंदिरा नगर, टागोर नगर व विक्रोळी पूर्वेकडील ९० फूट रस्त्यापासून संतोषी माता नाल्याच्या दक्षिण बाजूस आरसीसी बांधकाम असलेली संरक्षक भिंत बांधण्यासाठी निविदा मागवल्या आहेत. १७५ मीटर लांब व ९ मीटर रूंद नाल्याशेजारी संरक्षक भिंत बांधण्यात येणार आहे.

राज्याच्या EV धोरणाला अपवाद! बॉम्बे उच्च न्यायालयातील ६३ न्यायमूर्तींसाठी नवीन पेट्रोल-डिझेल गाड्यांना परवानगी

गणेशोत्सवासाठी एसटीच्या ५ हजार जादा बसेस; कोकणात जाणाऱ्या प्रवाशांना दिलासा

कबुतरखाने तोडण्यास तात्पुरती मनाई; मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश

शाडू मातीच्या मूर्ती आता होणार ‘ऑनलाइन’ उपलब्ध; पर्यावरणपूरक गणेशोत्सवासाठी BMC चे विशेष प्रयत्न

गेटवे ऑफ इंडियाजवळ प्रवासी जेट्टीला परवानगी; परिसरात सुविधा पुरवताना खबरदारी घेण्याचे हायकोर्टाचे सरकारला निर्देश