बेस्ट बसेसना टोलमाफी द्या! बेस्ट समिती अध्यक्षांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र; पाच वर्षांत ७० कोटींचा टोल भरला (संग्रहित फोटो)
मुंबई

बेस्ट बसेसना टोलमाफी द्या! बेस्ट समिती अध्यक्षांचे उपमुख्यमंत्र्यांना पत्र; पाच वर्षांत ७० कोटींचा टोल भरला

आर्थिक कोंडी फोडण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीने विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बेस्ट बसेसना टोलमाफी द्यावी, अशी मागणी बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे.

Swapnil S

मुंबई : आर्थिक कोंडी फोडण्यासाठी बेस्ट उपक्रमाच्या वतीने विविध उपाययोजना आखल्या जात आहेत. त्याचाच एक भाग म्हणून बेस्ट बसेसना टोलमाफी द्यावी, अशी मागणी बेस्ट समिती अध्यक्ष तृष्णा विश्वासराव यांनी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे. एसटी महामंडळाच्या गाड्यांना पथकरातून वगळण्यात आले आहे. त्यामुळे बेस्ट बसेसनाही पथकरातून वगळा, अशी मागणी केल्याचे तृष्णा विश्वाराव यांनी सांगितले.

दरम्यान, गेल्या पाच वर्षांत तब्बल ७० कोटींचा टोल भरण्यात आल्याचे त्यांनी पत्रात नमूद केले आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवलेल्या पत्रात, बेस्ट उपक्रमाकडून महापालिका हद्दीच्या पलीकडे ठाणे, नवी मुंबई आणि मीरा-भाईंदर या ठिकाणच्या ४० बसमार्गांवर ३८२ बसगाड्यांमार्फत २०४६ बसफेऱ्या करण्यात येतात. या बसगाड्यांना पथकर नाक्यावर बेस्ट उपक्रमातर्फे पथकर प्रदान करण्यात येतो. बेस्ट ही सार्वजनिक सेवा देणारी संस्था असून ‘ना नफा, ना तोटा’ आधारित बससेवा देते. त्यामुळे एसटी महामंडळाच्या बसगाडयांना वागळण्यात आलेल्या पथकर सवलतीच्या धर्तीवर बेस्ट उपक्रमांच्या गाड्यांना देखील पथकरातून वगळा, अशी मागणी केली आहे.

दीड लाखांपर्यंत कॅशलेस उपचार; अपघातग्रस्तांसाठी ‘पीएम-राहत’ योजना प्रभावीपणे राबवा - आरोग्य मंत्री

रायगडात महायुतीचे नवे राजकीय समीकरण; मुख्यमंत्र्यांच्या हस्तक्षेपानंतर शिंदेसेना-भाजप-राष्ट्रवादी एकत्र

शास्ती माफ योजनेस ठाणेकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; पालिकेच्या तिजोरीत एका दिवसात १३.५० कोटींची भर

Iran vs US-Israel War : होर्मुझवर इराणची घट्ट पकड, युद्ध आणखी भडकणार? मध्यपूर्वेतील युद्धात मोठी ठिणगी पडण्याची शक्यता

डॉ. राजनिश कामत यांची कार्यवाह कुलगुरू म्हणून नियुक्ती