मुंबई

Mumbai : गर्दीच्या वेळी फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करणे म्हणजे निष्काळजीपणा नाही; मृताच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे आदेश

पीक अवरला लोकलमध्ये दरवाज्याजवळ उभे असताना झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी रेल्वेकडून मृत प्रवाशाच्या नातेवाईकांना भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात होती. या गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले.

Krantee V. Kale

मुंबई : कामावर जाणाऱ्या प्रवाशाला ‘पीक अवर’ला लोकलमध्ये शिरणे कठीण असते. अशा वेळी जीव धोक्यात घालून प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे गर्दीच्या वेळी फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करणे म्हणजे निष्काळजीपणा नाही, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना भरपाई द्यावी, असा आदेश रेल्वे प्राधिकरणाला दिला.

पीक अवरला लोकलमध्ये दरवाज्याजवळ उभे असताना झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी रेल्वेकडून मृत प्रवाशाच्या नातेवाईकांना भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात होती. या गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले.

भाईंदरहून मरीन लाइन्सला प्रवास करताना २८ ऑक्टोबर २००५ रोजी प्रवासी लोकल ट्रेनमधून पडला. या अपघातात जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या नातेवाईकाला भरपाई देण्याचे आदेश रेल्वे प्राधिकरणाने दिला. मात्र त्या विरोधात रेल्वेने याचिका दाखल केली होती.

Mumbai : धरणातील पाणीसाठा ९० टक्क्यांवर; १० टक्के पाणीकपात मागे घेण्याबाबत तूर्तास निर्णय नाही - अभिजीत बांगर

पालघर जिल्ह्यातील पूरग्रस्तांना मदत जाहीर; मदत आणि पुनर्वसन विभागाचा शासन निर्णय जारी

घाटकोपर हिट अँड रन प्रकरण : अल्पवयीन आरोपीचा जामीन रद्द

मंत्री नितीन गडकरींच्या नागपुरातील घराबाहेर काँग्रेसचे आंदोलन; कार्यकर्त्यांना पोलिसांनी घेतले ताब्यात

पश्चिम महाराष्ट्रातील ९१५ गावे पर्यावरणदृष्ट्या संवेदनशील; सातारा जिल्ह्यातील ३०६ गावांचा समावेश, केंद्र सरकारचा मसुदा जाहीर