मुंबई

Mumbai : गर्दीच्या वेळी फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करणे म्हणजे निष्काळजीपणा नाही; मृताच्या नातेवाईकांना भरपाई देण्याचे आदेश

पीक अवरला लोकलमध्ये दरवाज्याजवळ उभे असताना झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी रेल्वेकडून मृत प्रवाशाच्या नातेवाईकांना भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात होती. या गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले.

Krantee V. Kale

मुंबई : कामावर जाणाऱ्या प्रवाशाला ‘पीक अवर’ला लोकलमध्ये शिरणे कठीण असते. अशा वेळी जीव धोक्यात घालून प्रवास करण्याशिवाय पर्याय नसतो. त्यामुळे गर्दीच्या वेळी फुटबोर्डवर उभे राहून प्रवास करणे म्हणजे निष्काळजीपणा नाही, असे स्पष्ट करत न्यायमूर्ती जितेंद्र जैन यांच्या एकलपीठाने मृत व्यक्तीच्या नातेवाईकांना भरपाई द्यावी, असा आदेश रेल्वे प्राधिकरणाला दिला.

पीक अवरला लोकलमध्ये दरवाज्याजवळ उभे असताना झालेल्या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला होता. या प्रकरणी रेल्वेकडून मृत प्रवाशाच्या नातेवाईकांना भरपाई देण्यास टाळाटाळ केली जात होती. या गंभीर दखल घेत मुंबई उच्च न्यायालयाने रेल्वे प्रशासनाला चांगलेच फैलावर घेतले.

भाईंदरहून मरीन लाइन्सला प्रवास करताना २८ ऑक्टोबर २००५ रोजी प्रवासी लोकल ट्रेनमधून पडला. या अपघातात जखमी झाल्याने त्याचा मृत्यू झाला. अपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशाच्या नातेवाईकाला भरपाई देण्याचे आदेश रेल्वे प्राधिकरणाने दिला. मात्र त्या विरोधात रेल्वेने याचिका दाखल केली होती.

IIT मुंबईतील विद्यार्थ्याची आत्महत्या; परीक्षेत ChatGPT वापरल्याचा आरोप, प्रशासनाविरोधात विद्यार्थ्यांचे आंदोलन

Ulhasnagar : धुक्याच्या आड रात्री ‘केमिकल गॅस’चा खेळ? उग्र वास अन् धुक्याची चादर; जिल्हाधिकाऱ्यांकडे तक्रार

Ganeshotsav 2026 : गणपतीच्या सजावटीत FDA ची झलक; तुकाराम मुंढेंच्या कामाला अनोख्या पद्धतीने सलाम, Video

Mumbai : ‘त्या’ फुटबॉल मैदानावर ‘एमएफए’चा अधिकार नाही; म्हाडाची उच्च न्यायालयात माहिती

Mumbai : पालिकेने SIR साठी मोजले १०.८१ कोटी रुपये; चार महिन्यांत १,३०४ डेटा एंट्री ऑपरेटरची नियुक्ती