मुंबई

समुद्रात इंधन आणि बिटुमेनची तस्करी; जहाज मालकांना हायकोर्टाचा झटका

मुंबई किनारपट्टीजवळ जप्त करण्यात आलेल्या तीन जहाज मालकांना हायकोर्टाने चांगलाच झटका दिला. सुरक्षेचा धोका आणि सागरी वाहतुकीतील अडथळे लक्षात घेता, तिन्ही जहाजांची सुटका करण्याची मागणी फेटाळून लावत, या जहाजांना गुजरातच्या अलंग शिप यार्डकडे हलवण्याचे आदेश दिले.

Swapnil S

मुंबई : मुंबई किनारपट्टीजवळ जप्त करण्यात आलेल्या तीन जहाज मालकांना हायकोर्टाने चांगलाच झटका दिला. मुख्य न्यायमूर्ती श्री चंद्रशेखर व न्यायमूर्ती गौतम अंखड यांच्या खंडपीठाने सुरक्षेचा धोका आणि सागरी वाहतुकीतील अडथळे लक्षात घेता, तिन्ही जहाजांची सुटका करण्याची मागणी फेटाळून लावत, या जहाजांना गुजरातच्या अलंग शिप यार्डकडे हलवण्याचे आदेश दिले.

समुद्रात बेकायदेशीरपणे इंधन आणि बिटुमेनची वाहतूक केल्याप्रकरणी एमटी अस्फॉल्ट स्टार, एमटी स्टेलर रुबी आणि एमटी अल जाफझिया ही जहाजे मुंबईच्या किनारपट्टीपासून ११ नॉटिकल मैल अंतरावर ताब्यात घेण्यात आली. आंतरराष्ट्रीय निर्बंध टाळण्यासाठी या जहाजांनी आपली लोकेशन सिस्टिम बंद ठेवली आणि इराणमधून प्रतिबंधित बिटुमेन आणि इंधनाची चोरटी वाहतूक केल्याच्या आरोपाखाली ही जहाजे जप्त करण्यात आली.

मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरण : गँगस्टर अबू सालेमच्या मुदतपूर्व सुटकेची याचिका फेटाळली; सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय

Mumbai : राडारोडा वाहतूक करणाऱ्या वाहनांना नोंदणी अनिवार्य; २३ सप्टेंबरपर्यंत नोंदणीची मुदत

Thane : लोकलमधून महिला प्रवासी खाली पडली; दिवा-मुंब्रा वळणावरील Video व्हायरल

AI 80s Photo Trend : राजकीय नेत्यांनाही एआय ट्रेंडची भुरळ; १९८० च्या दशकातील रेट्रो लूक सोशल मीडियावर व्हायरल

ठाणे कोस्टल रोड-१च्या कामाला वेग; १४ महिन्यांत ४० टक्के काम पूर्ण