नागरिकांना जमिनीच्या मोबदल्याशिवाय वंचित ठेवता येणार नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय Freepic
मुंबई

नागरिकांना जमिनीच्या मोबदल्याशिवाय वंचित ठेवता येणार नाही; उच्च न्यायालयाचा महत्त्वपूर्ण निर्णय

कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता आणि मोबदला न देता नागरिकांना त्यांच्या जमिनीच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत उच्च न्यायालयाने मंगळवारी नवी मुंबईतील जमीन संपादनाच्या एका प्रकरणात सिडको आणि राज्य सरकारला मोठा दणका दिला.

Swapnil S

मुंबई : कायदेशीर प्रक्रिया पूर्ण न करता आणि मोबदला न देता नागरिकांना त्यांच्या जमिनीच्या हक्कापासून वंचित ठेवता येणार नाही, असा महत्त्वपूर्ण निर्वाळा देत उच्च न्यायालयाने मंगळवारी नवी मुंबईतील जमीन संपादनाच्या एका प्रकरणात सिडको आणि राज्य सरकारला मोठा दणका दिला. न्यायमूर्ती मनीष पितळे व न्यायमूर्ती श्रीराम शिरसाट यांच्या खंडपीठाने सरकार आणि सिडकोला २०१३ च्या नवीन कायद्यानुसार भूसंपादनाची प्रक्रिया तत्काळ सुरू करण्याचे आदेश दिले.

नवी मुंबई शहराच्या उभारणीसाठी २४ सप्टेंबर १९८६ रोजी तत्कालीन भूसंपादन कायदा, १८९४ च्या कलम ४ अंतर्गत ठाणे जिल्ह्यातील करावे गावातील विविध जमिनी अधिग्रहित करण्यासाठी नोटीस काढण्यात आली होती. ३१ ऑगस्ट १९८९ रोजी जमिनीचा मोबदला ठरवण्यासाठी निवाडा जाहीर करण्यात आला. मात्र, इतर जमिनींचा मोबदला ठरवला गेला असताना याचिकाकर्त्याच्या जमिनीचे मूल्यमापन झाले नाही. त्याविरोधात रोशन तांडेल यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती.

नवीन कायद्यानुसार भूसंपादन करा

या याचिकेवर सविस्तर सुनावणी घेत खंडपीठाने ६ एप्रिलला निकाल राखून ठेवला होता. तो निकाल मंगळवारी जाहीर केला. प्रशासनाने विलंब आणि निष्काळजीपणाचे कारण पुढे करून याचिकाकर्त्याचा हक्क नाकारण्याचा प्रयत्न केला होता. प्रशासनाचा तो प्रयत्न न्यायालयाने हाणून पाडला. योग्य कायदेशीर प्रक्रिया आणि मोबदला न देता जमीन संपादन करणे बेकायदेशीर आहे, असे निरीक्षण नोंदवत न्यायालयाने सिडको आणि राज्य सरकारला २०१३ च्या नवीन कायद्यानुसार नव्याने भूसंपादन आणि भरपाईची प्रक्रिया पूर्ण करण्याचे आदेश दिले आहेत. यासाठी एक वर्षाची मुदत दिली.

शासकीय कर्मचाऱ्यांना हिंदी भाषा परीक्षेची सक्ती; मराठी अभ्यास केंद्राचा आंदोलनाचा इशारा

अबकारी (मद्य) धोरण प्रकरण : केजरीवाल, सिसोदिया यांच्या वतीने ज्येष्ठ वकिलांची नियुक्ती करणार

बनावट प्रमाणपत्र प्रकरणात गुन्हे तत्काळ दाखल करा, महापौर रितू तावडेंचे निर्देश; ८७ हजार अवैध जन्म प्रमाणपत्रांचा घोटाळा उघड, चौकशीसाठी SIT स्थापन

Mumbai : आरोग्य सेवेतील खासगीकरणाचा हट्ट कायम; पालिका रुग्णालयांतील सफाईसाठी १०१ कोटींचे कंत्राट

पंजाबचे मुख्यमंत्री मान-राष्ट्रपती भेट; राज्यातील ६ राज्यसभा खासदारांचे सदस्यत्व रद्द करण्याची केली मागणी