मुंबई

मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक

प्रतिनिधी

मुंबई : मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील एका टोळीचा शिवडी पोलिसांनी पर्दाफाश करून तीन रेकॉर्डवरील गुन्हेगारांना अटक केली. उस्मान मंगरे खान, प्रकाश हरि परमार आणि दिपक डावा वाघेला अशी या तिघांची नावे आहेत. या तिघांकडून पोलिसांनी २८० चोरीचे मोबाईलसह पाच टँक आणि गुन्ह्यांतील बाईक असा सुमारे साडेनऊ लाखांचा मुद्देमाल जप्त केला आहे. २७ सप्टेंबरला शिवडी येथे मोबाईल चोरीची एक घटना घडली होती. याप्रकरणी गुन्हा नोंद होताच पोलिसांनी आरोपींचा शोध सुरू केला होता. ही शोधमोहीम सुरू असताना सीसीटिव्ही फुटेज आणि तांत्रिक माहितीवरून पोलिसांनी शिवडी, नागपाडा आणि शीव परिसरात राहणार्‍या उस्मान खान, प्रकाश परमार आणि दिपक वाघेला या तीन संशयितांना चौकशीसाठी ताब्यात घेतले होते. चौकशीदरम्यान ते तिघेही मोबाईल चोरीच्या गुन्ह्यांतील रेकॉर्डवरील गुन्हेगार असल्याचे उघडकीस आले.

ठाकरे गटाचा पाठिंबा घेण्याचा प्रश्नच उद्भवत नाही! ‘एनडीए’ला बहुमत मिळणार; देवेंद्र फडणवीस यांना विश्वास

धक्कादायक! दहा वर्षाच्या चिमुकल्याचा गळा चिरून मृतदेह खाडीत फेकला, हत्येप्रकरणी वडिलांच्या मित्राला अटक

वांद्रे ते मरीन ड्राईव्ह फक्त १२ मिनिटांत! २.५ हजार मेट्रिक टन वजनाचा गर्डर लाँच

काय सांगता! फक्त ६ लाखांत घरी आणा 'या' जबरदस्त कार, फीचर्सही आहेत दमदार

होर्डिंगचा पाया मजबूत होता का? व्हीजेटीआय करणार ऑडिट; स्ट्रक्चरल ऑडिट रिपोर्ट सादर करण्याचा पालिकेचा आदेश