मुंबई

महापरिवर्तन ऐतिहासिक- देवेंद्र फडणवीस

'आजचा विजयी दिवस हा आपल्या सर्वांकरीता ऐतिहासिक आहे. आम्हाला बाहेरचे म्हणणाऱ्यांना मी सांगितले की भाजपची निर्मिती केली ते श्यामाप्रसाद मुखर्जी हेच बंगालचे होते. त्यामुळे भाजप हा खरा बंगालचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून पश्चिम बंगालच्या जनतेने महापरिवर्तन करून दाखवले.

Swapnil S

मुंबई : 'आजचा विजयी दिवस हा आपल्या सर्वांकरीता ऐतिहासिक आहे. आम्हाला बाहेरचे म्हणणाऱ्यांना मी सांगितले की भाजपची निर्मिती केली ते श्यामाप्रसाद मुखर्जी हेच बंगालचे होते. त्यामुळे भाजप हा खरा बंगालचा पक्ष आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून पश्चिम बंगालच्या जनतेने महापरिवर्तन करून दाखवले. आसाम, पाँडिचेरी, पश्चिम बंगालमधील भारतातल्या जना जनाचा हा विजय आहे, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सोमवारी केले. दरम्यान, निवडणुकीतील यशाबद्दल मुख्यमंत्री फडणवीस आणि भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांच्या प्रमुख उपस्थितीत मुंबईच्या भाजप प्रदेश कार्यालयात जल्लोष करण्यात आला. यावेळी झालमुडी अर्थात भेळ खाऊन व गुलाल उधळून आनंद व्यक्त करण्यात आला.

अमितभाईच चाणक्य - शिंदे

पाच राज्यांपैकी ३ राज्यांमध्ये भाजपप्रणित एनडीए जिंकली आहे. याबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे एकनाथ शिंदे यांनी अभिनंदन केले. लोकांनी विश्वास दाखवला आहे. बंगालचा विजय ऐतिहासिक आहे, घवघवीत यश मिळाले आहे. पश्चिम बंगालमधील भय, दहशत आता संपल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. ममतादीदींचे भय संपले आणि मोदीजींचा विश्वास जिंकल्याचे ते म्हणाले. अमित शाह हे मागील १० वर्षांपासून पक्ष वाढीचे काम करत होते. त्यांच्या मेहनतीला यश मिळाले आहे. अमितभाई खरे चाणक्य आहेत हे सिद्ध झाल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा जन्म या राज्यात झाला. त्यांना ही श्रद्धांजली अर्पण केली आहे.

बंगालमध्ये 'कमळ', तमिळनाडूत 'विजय'; आसाममध्ये BJP ची हॅटट्रिक; दक्षिण मात्र अजूनही दूरच, केरळने डाव्यांना डावलले

सुनेत्रा पवारांचा विक्रम! बारामतीत दोन लाख १८ हजारांच्या फरकाने ऐतिहासिक विजय; राहुरीत भाजपचे अक्षय कर्डिले विजयी

'गंगोत्री ते गंगासागरापर्यंत' फुलले कमळ; जल्लोषाच्या सभेत मोदींचे प्रतिपादन

स्टालिन, विजय, ममतांशी राहुल यांनी साधला संवाद

जागतिक दमा दिवस २०२६ : उष्णतेच्या लाटा वाढवत आहेत दम्याचा त्रास; रुग्णांनी काय काळजी घ्यावी?