मुंबई उच्च न्यायालय (संग्रहित छायाचित्र) 
मुंबई

उमेदवारी अर्ज फेटाळल्याप्रकरणी आज सुनावणी; विविध कारणास्तव अर्ज फेटाळल्याने उमेदवारांची उच्च न्यायालयात धाव

विभाग क्रमांक १ ते २२७ चे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या महापालिका आयुक्तांनी या उमेदवारांचे अर्ज विविध कारणांस्तव फेटाळले होते.

Swapnil S

मुंबई : मुंबई महानगरपालिका निवडणूक लढवण्यास इच्छुक असलेल्या अनेक उमेदवारांचा अर्ज बाद ठरवण्यात आला होता. मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावल्यानंतर, या उमेदवारांच्या याचिकेवर शुक्रवारी तातडीची सुनावणी घेण्याचा निर्णय उच्च न्यायालयाने घेतला आहे.

विभाग क्रमांक १ ते २२७ चे निवडणूक निर्णय अधिकारी तसेच जिल्हा निवडणूक अधिकारी म्हणून काम पाहणाऱ्या महापालिका आयुक्तांनी या उमेदवारांचे अर्ज विविध कारणांस्तव फेटाळले होते. तथापि, सत्ताधारी पक्षाला खूश करण्यासाठी हे अर्ज फेटाळले असावेत, असा संशय याचिकाकर्त्यांनी याचिकेत उपस्थित केला आहे. त्याचप्रमाणे, उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी दिलेली सात दिवसांची मुदत अत्यंत कमी असल्याचा दावा देखील केला आहे. मुख्य न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखालील खंडपीठापुढे ही याचिका सादर करण्यात आली तेव्हा न्यायालयाने याचिकेवर तातडीने सुनावणी घेण्यास सहमती दर्शवली.

वांद्रे पूर्व येथील मोझम अली मीर यांनी ही जनहित याचिका दाखल केली आहे. बहुतेक उमेदवारांचे अर्ज त्यांच्या शपथपत्रे किंवा प्रश्न-उत्तरपत्रिका योग्य स्वरूपात नसल्यामुळे किंवा त्यांनी पोलिस, पाणी, कर, सांडपाणी आणि मालमत्ता या पाच विभागांकडून ना-हरकत प्रमाणपत्रे (एनओसी) सादर न केल्यामुळे, जे कायदेशीररित्या आवश्यक नव्हते, अशा कारणांमुळे नाकारण्यात आले. तथापि, याचिकाकर्त्यांचा असा दावा आहे की पाणी, मालमत्ता कर आणि बांधकाम प्रस्ताव हे विभाग थेट महानगरपालिकेच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली असल्याने, ना-हरकत प्रमाणपत्रांची मागणी अनियंत्रित, अवास्तव आणि संविधानानुसार समानतेच्या अधिकाराचे उल्लंघन आहे. ना-हरकत प्रमाणपत्रे मिळण्यास विलंब करण्यासाठी विरोधी उमेदवारांकडून राजकीय कट रचल्याची शक्यताही याचिकेत व्यक्त केली आहे.

Mira Bhayandar :अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

Mumbai : मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पला प्रतिसाद; सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे आयोजन

Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

आदिवासीबहुल जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ८१४ बालक-माता मृत्यू; पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड