मुंबई

भारतीय शेअर बाजारात सहाव्या दिवशी चढता आलेख; सेन्सेक्स २१४ अंकांनी वधारला

दोलायमान सत्रात दि ३०-शेाअर बीएसई सेन्सेक्स २१४.१७ अंकांनी वधारुन ५८,३५०.५३ वर बंद झाला.

वृत्तसंस्था

जागतिक बाजारातील सकारात्मक वातावरणआणि विदेशी गुंतवणूक संस्थांनी खरेदी सुरु ठेवल्याने भारतीय शेअर बाजारात सलग सहाव्या दिवशी बुधवारी चढता आलेख राहिला. माहिती तंत्रज्ञान आणि रिलायन्स इंडस्ट्रीज आदी कंपन्यांच्या समभागांची खरेदी झाल्याने सेन्सेक्स २१४ अंकांनी वधारला.

दोलायमान सत्रात दि ३०-शेाअर बीएसई सेन्सेक्स २१४.१७ अंकांनी वधारुन ५८,३५०.५३ वर बंद झाला. दिवसभरात तो ५८,४१५.६३ वर बंद झाला. तर किमान पातळी ५७,७८८.७८ झाली होती. अशाच प्रकारे राष्ट्रीय शेअर बाजारात निफ्टी ४२.७० ने वाढून १७,३८८.१५ वर बंद झाला.

सेन्सेक्सवर्गवारीत टेक महिंद्रा, टीसीएस, इन्फोसिस, टायटन, एशियन पेंटस‌्, आयसीआयसीआय बँक, भारती एअरटेल आणि रिलायन्स इंडस्ट्रीजच्या समभागांमध्ये वाढ झाली. तर मारुती सुझुकी, सन फार्मा, कोटक महिंद्रा बँक, इंडस‌्इंड बँक आणि बजाज फायनान्स यांच्या समभागात घसरण झाली.

दरम्यान, आंतरराष्ट्रीय तेल बाजारात ब्रेंट क्रूड ०.९१ टक्का घसरुन प्रति बॅरलचा भाव ९९.६३ अमेरिकन डॉलर्स झाला. तसेच विदेशी गुंतवणूक संस्थांनी मंगळवारी ८२५.१८ कोटींच्या समभागांची खरेदी केली.

Maharashtra Rain : महाराष्ट्राला पावसाचा तडाखा; ८३ लाख एकरपेक्षा जास्त पिकांचे नुकसान

मराठवाडा पूरग्रस्तांसाठी लालबागचा राजा मंडळाची मदत; पारलिंगी समुदायाने मागितला जोगवा, राज्यातील शिक्षकांचाही पुढाकार

शाहरुख खान लेकामुळे पुन्हा अडचणीत! समीर वानखेडेंची न्यायालयात धाव, २ कोटींचा मानहानीचा दावा

मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी निर्दोष मुक्ततेनंतर लष्करात पुन्हा स्थान; प्रसाद पुरोहित यांची कर्नल पदी बढती

पुन्हा उभं राहण्याची आशा संपली! धाराशिवमध्ये शेतकऱ्याची आत्महत्या; अतिवृष्टीने शेत गेलं वाहून