मुंबई

जय भीम नगर कारवाईचा तपास एसआयटीकडे सोपवला, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

उच्य न्यायालयाने फटकारल्यानंतर ताळ्यावर आलेल्या राज्य सरकारने जय भीम नगरचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयात दिली.

Swapnil S

मुंबई : पवईतील जय भीम नगरच्या झोपड्यांवर पावसाळ्यात करण्यात आलेल्या कारवाईचा तपास परस्पर साकी नाका पोलिसांकडे वर्ग करणाऱ्या राज्य सरकारने अखेर शरणागती पत्करली. उच्य न्यायालयाने फटकारल्यानंतर ताळ्यावर आलेल्या राज्य सरकारने जय भीम नगरचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयात दिली.

पवई येथील जयभीम नगरमधील शेकडो झोपड्यांवर ऐन पावसाळ्यात तोडक कारवाई करण्यात आली. या प्रकरणी रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल करत पालिका तसेच पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली.

तसेच भरपाई देण्याची विनंती याचिकेत केली. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शशी कुमार मीना हे या विशेष तपास पथकाचे नेतृत्व करतील.

रिकव्हरी एजंट्सना RBI चा दणका! कर्जवसुलीच्या दादागिरीला लगाम; १ जुलैपासून लागू होणार नवे नियम; वाचा सविस्तर

BNP च्या विजयामुळे भारत-बांगलादेश संबंधांना नवी दिशा? PM मोदींनी तारीक रहमान यांचे "निर्णायक विजयाबद्दल" केले अभिनंदन

सरकारी कर्मचाऱ्यांच्या बदलीला मुदतवाढ नाही; सामान्य प्रशासन विभागाचे आदेश जारी

परभणीत शिवसेना ठाकरे गटाचे सय्यद इक्बाल महापौर; भाजपच्या तिरूमला खिल्लारे यांना पराभवाचा धक्का

हायकोर्टाने मल्ल्यांना दिली शेवटची संधी; भारतात येण्याबाबत स्पष्टीकरण द्या, मगच याचिकेवर सुनावणी घेऊ