मुंबई

जय भीम नगर कारवाईचा तपास एसआयटीकडे सोपवला, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

उच्य न्यायालयाने फटकारल्यानंतर ताळ्यावर आलेल्या राज्य सरकारने जय भीम नगरचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयात दिली.

Swapnil S

मुंबई : पवईतील जय भीम नगरच्या झोपड्यांवर पावसाळ्यात करण्यात आलेल्या कारवाईचा तपास परस्पर साकी नाका पोलिसांकडे वर्ग करणाऱ्या राज्य सरकारने अखेर शरणागती पत्करली. उच्य न्यायालयाने फटकारल्यानंतर ताळ्यावर आलेल्या राज्य सरकारने जय भीम नगरचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयात दिली.

पवई येथील जयभीम नगरमधील शेकडो झोपड्यांवर ऐन पावसाळ्यात तोडक कारवाई करण्यात आली. या प्रकरणी रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल करत पालिका तसेच पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली.

तसेच भरपाई देण्याची विनंती याचिकेत केली. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शशी कुमार मीना हे या विशेष तपास पथकाचे नेतृत्व करतील.

INS Udaygiri: ‘उदयगिरी’ भारतीय नौदलाच्या ताफ्यात; स्वीकृती दस्तावेजावर स्वाक्षरी, बघा काय आहे खासियत?

पंढरपूर वारीत अर्बन नक्षलवादी? विधानसभेत आमदार मनीषा कायंदे काय म्हणाल्या? बघा Video

कोस्टल रोडच्या दुसऱ्या टप्प्याला केंद्र सरकारची मंजुरी; प्रकल्पाच्या अंमलबजावणीसाठी पालिका करणार हायकोर्टात अर्ज

पुण्यातील नद्यांच्या पूररेषा नव्याने आखाव्यात; ४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उच्च न्यायालयाचे निर्देश

Dombivli : ''घरी कोणीही नाही, फाशी घे''...तरुणीचा WhatsApp मेसेज अन् तरुणाने उचललं टोकाचं पाऊल; गुन्हा दाखल