मुंबई

जय भीम नगर कारवाईचा तपास एसआयटीकडे सोपवला, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

उच्य न्यायालयाने फटकारल्यानंतर ताळ्यावर आलेल्या राज्य सरकारने जय भीम नगरचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयात दिली.

Swapnil S

मुंबई : पवईतील जय भीम नगरच्या झोपड्यांवर पावसाळ्यात करण्यात आलेल्या कारवाईचा तपास परस्पर साकी नाका पोलिसांकडे वर्ग करणाऱ्या राज्य सरकारने अखेर शरणागती पत्करली. उच्य न्यायालयाने फटकारल्यानंतर ताळ्यावर आलेल्या राज्य सरकारने जय भीम नगरचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयात दिली.

पवई येथील जयभीम नगरमधील शेकडो झोपड्यांवर ऐन पावसाळ्यात तोडक कारवाई करण्यात आली. या प्रकरणी रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल करत पालिका तसेच पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली.

तसेच भरपाई देण्याची विनंती याचिकेत केली. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शशी कुमार मीना हे या विशेष तपास पथकाचे नेतृत्व करतील.

श्रीनगर हादरले! फरिदाबादमधून जप्त केलेल्या स्फोटकांचा पोलिस स्टेशनमध्ये भीषण स्फोट, ९ जणांचा मृत्यू, दहशतवादी हल्ल्याचा संशय

बिहारमध्ये 'अब की बार भी' रालोआ सरकार; २४३ पैकी २०२ जागा जिंकून महाविजय; महाआघाडीला केवळ ३५ जागा

Navle Bridge Accident : पुणे अपघातप्रकरणी ट्रकचालकासह तिघांविरुद्ध गुन्हा दाखल

विधानसभा पोटनिवडणुकीत संमिश्र निकाल; काँग्रेसला राजस्थान, तेलंगणात यश

Red Fort Blast : दिल्ली स्फोटातील दहशतवादी उमरचे घर स्फोटाद्वारे उडवले