मुंबई

जय भीम नगर कारवाईचा तपास एसआयटीकडे सोपवला, राज्य सरकारची उच्च न्यायालयात माहिती

उच्य न्यायालयाने फटकारल्यानंतर ताळ्यावर आलेल्या राज्य सरकारने जय भीम नगरचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयात दिली.

Swapnil S

मुंबई : पवईतील जय भीम नगरच्या झोपड्यांवर पावसाळ्यात करण्यात आलेल्या कारवाईचा तपास परस्पर साकी नाका पोलिसांकडे वर्ग करणाऱ्या राज्य सरकारने अखेर शरणागती पत्करली. उच्य न्यायालयाने फटकारल्यानंतर ताळ्यावर आलेल्या राज्य सरकारने जय भीम नगरचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आल्याची माहिती उच्च न्यायालयात दिली.

पवई येथील जयभीम नगरमधील शेकडो झोपड्यांवर ऐन पावसाळ्यात तोडक कारवाई करण्यात आली. या प्रकरणी रहिवाशांनी मुंबई उच्च न्यायालयात धाव घेत याचिका दाखल करत पालिका तसेच पोलिसांवर कारवाई करण्याची मागणी केली.

तसेच भरपाई देण्याची विनंती याचिकेत केली. या याचिकेवर न्यायमूर्ती रेवती मोहिते-डेरे आणि न्यायमूर्ती पृथ्वीराज चव्हाण यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. या प्रकरणाचा तपास एसआयटीकडे सोपवण्यात आला आहे. अतिरिक्त पोलीस आयुक्त (गुन्हे) शशी कुमार मीना हे या विशेष तपास पथकाचे नेतृत्व करतील.

रुग्णालयच आता होणार अर्जदार! अर्जमंजुरीची प्रक्रिया ८ तासांत; सीएम सहाय्यता निधीची नवीन प्रणाली

रांजणगाव महागणपती मंदिर डागडुजीसाठी तीन महिने बंद

बिहारमध्ये सत्तांतराच्या हालचालींना वेग; नितीश कुमार आज देणार मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा

'धुरंधर २' मोडणार 'पुष्पा २'चा विक्रम; चित्रपटाने २५ दिवसांत कमावले १७१२ कोटी; परदेशातील कमाई ४१५ कोटींची

काॅर्पोरेट जिहाद प्रकरणाची TCS कडून चौकशी; नाशिकमधील प्रकार क्लेशदायक असल्याची प्रतिक्रिया