मुंबई

खड्ड्यांमुळे रस्त्यांची चाळण; मुंबईतील रस्त्यांवर चार वर्षांत सव्वादोन लाख खड्डे

Swapnil S

मुंबई : ‘पुढील दोन वर्षांत मुंबईतील रस्ते खड्डेमुक्त’, असा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात येतो. मात्र गेल्या चार वर्षांत मुंबईच्या रस्त्यांवर २ लाख २० हजार खड्डे पडल्याचे समोर आले आहे. दरम्यान, खड्डे पडल्याचे निदर्शनास येताच वेळीच बुजवण्यात आल्याचे पालिका प्रशासनाकडून सांगण्यात आले.

पावसाआधी मुंबई महापालिकेच्या रस्ते विभागाकडून खड्डे बुजवण्याच्या कामाला सुरुवात केली जाते. सप्टेंबरपर्यंत हे काम सुरू असते. यासाठी कोट्यवधी रुपये खर्च केले जात असतानाही रस्ते अल्पावधीतच खड्डेमय होत असल्याची स्थिती कायम आहे. त्यामुळे मुंबईकरांना खड्ड्यांचा सामना करावा लागतो किंवा त्यातूनच मार्ग काढावा लागतो. या पार्श्वभूमीवर आगामी काळात रस्त्यांवर खड्डे पडूच नये, यासाठी ठोस उपाययोजना केल्या जाणार आहेत. यापुढे ‘हमी कालावधी’त खड्डे पडल्यास कंत्राटदाराला रोख दंड करण्यात येणार आहे. आगामी काळात देण्यात येणाऱ्या निविदामध्ये या अटीचा समावेश करावा, असा विचार महानगरपालिकेचा आहे.

मास्टिक तंत्रज्ञानामुळे खड्डे उखडत नसल्यामुळे मुंबईतील रस्त्यांची पावसाळ्याआधी दुरुस्ती, खड्डे बुजवण्याचे काम करताना केवळ खड्डे न बुजवता मास्टिक सरफेस तंत्रज्ञानाने रस्त्यांची दुरुस्ती केली जाणार आहे. मुंबई पालिकेच्या अखत्यारीत सुमारे दोन हजार किमीचे रस्ते आहेत. हे सर्व रस्ते काँक्रिटचे करण्याचे धोरणही राबवण्यात येत आहे. यामध्ये सुमारे ४०० किमी रस्त्यांच्या काँक्रिटीकरणासाठी महानगरपालिकेकडून कार्यवाही सुरू आहे.

मागील वर्षातील खड्डे

  • २०२० - ६५ हजार ६१७

  • २०२१ - ४३ हजार ४७८

  • २०२२ - ३८ हजार ३१०

  • २०२३ - ७१ हजार ७७३ (सप्टेंबरपर्यंत)

"एकनाथ शिंदेंना अपमानित करायचं नव्हतं..." देवेंद्र फडणवीसांचं मोठं विधान

"उद्धव ठाकरेंची मुलाखत म्हणजे काळू बाळूचा तमाशाच", चंद्रशेखर बावनकुळेंची टीका

मुंबई पोलिसांची मोठी कामगिरी, तब्बल १०७ कोटी रुपये किंमतीचं ड्रग्ज जप्त, राजस्थानमधील ड्रग्ज फॅक्टरीचा पर्दाफाश

ज्याला देव मानलं त्यानंच केला घात... नराधम शिक्षकानं अल्पवयीन विद्यार्थिनीवर केला बलात्कार

लॉटरीच की! फक्त ९ हजारात मिळतोय सॅमसंगचा 'हा' 5G स्मार्टफोन; जाणून घ्या काय आहे फीचर्स?