मुंबई

गरज पडल्यास शस्त्रेही उचलू; जैन मुनी निलेशचंद्र विजय यांचा इशारा

शांतताप्रिय असलेला जैन समाज कबुतरखान्यांसाठी आक्रमक झाला आहे. कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयाविरोधात हा समाज १३ ऑगस्टपासून आंदोलनाचे हत्यार उपसणार आहे. तसेच गरज पडल्यास शस्त्रेही हाती घेऊ आणि कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नाही असा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिला.

Swapnil S

मुंबई : शांतताप्रिय असलेला जैन समाज कबुतरखान्यांसाठी आक्रमक झाला आहे. कबुतरखाने बंद करण्याच्या निर्णयाविरोधात हा समाज १३ ऑगस्टपासून आंदोलनाचे हत्यार उपसणार आहे. तसेच गरज पडल्यास शस्त्रेही हाती घेऊ आणि कोर्टाच्या आदेशालाही जुमानणार नाही असा इशारा जैन मुनी निलेशचंद्र विजय यांनी दिला.

जैन समाज हा शांतताप्रिय आहे. शस्त्र उचलणे आमचे काम नाही. पण गरज पडली तर आम्ही धर्मासाठी शस्त्रे पण उचलू. आम्ही भारताचे संविधान मानतो, तसेच कोर्टालाही मानतो. परंतु आमच्या धर्माविरोधात आले तर आम्ही कोर्टालाही मानत नाही, असे निलेशचंद्र विजय म्हणाले. सध्या कबुतरखाने बंद करण्याचा सुरू असलेला प्रकार हा निवडणूक डोळ्यासमोर ठेवून सुरू आहे. आमचे पर्युषण पर्व संपल्यानंतर आम्ही पुढचा निर्णय घेऊ. आता आम्ही शांत बसणार नाही, असा इशारा विजय यांनी दिला.

१३ ऑगस्टपासून सुरू होणाऱ्या आंदोलनात देशभरातली जैन बांधव सहभागी होणार आहे. जीव, दया आमच्या धर्मात आहे. जैन धर्माला का लक्ष्य केले जात आहे? असा सवाल उपस्थित करून देशभरातली १० लाख जैन बांधव येथे उपोषणाला बसतील, असा इशारा निलेशचंद्र विजय यांनी दिला.

NEET UG 2026 Re-Exam : टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी; परीक्षेआधी NTA चा मोठा निर्णय

जोगेश्वरी रेल्वे टर्मिनसचे ५५ टक्के काम पूर्ण; ७६.४८ कोटी रुपयांच्या प्रकल्पाचे जानेवारी २०२७ पर्यंत लोकार्पण होण्याची शक्यता

Mumbai : वांद्रेतील मेट्रो २बीच्या बांधकामस्थळी आग; जळते अवशेष रस्त्यावर पडल्याचा व्हिडीओ व्हायरल, MMRDA चे स्पष्टीकरण

Kalyan : मोठागाव रेल्वे उड्डाणपुलासाठी निविदा जारी; २४ महिन्यांत काम पूर्ण करण्याचे उद्दिष्ट

एकनाथ शिंदेंचे नाव वगळल्याने महायुतीत संघर्ष; शासकीय कार्यक्रमाच्या निमंत्रण पत्रिकेमुळे वाद