मुंबई

माथाडी चळवळीत शिरलेल्या गुंडगिरीकडे सरकारचे दुर्लक्ष, माथाडी नेत्यांचा आरोप

माथाडी चळवळीत शिरलेली गुंडगिरी मोडून काढण्याऐवजी त्याच्या नावाखाली कायदाच मोडीत काढण्याचा राज्य सरकारचा हेतू आहे की काय, असा सवाल आता गरीब कष्टकरी माथाडी कामगारांकडून केला जाऊ लागला आहे.

Swapnil S

मुंबई : माथाडी चळवळीत शिरलेली गुंडगिरी मोडून काढण्याऐवजी त्याच्या नावाखाली कायदाच मोडीत काढण्याचा राज्य सरकारचा हेतू आहे की काय, असा सवाल आता गरीब कष्टकरी माथाडी कामगारांकडून केला जाऊ लागला आहे.

माथाडी कायदा आणि माथाडी कामगार यामुळे महाराष्ट्र विशेषत: मुंबई आणि उपनगर परिसरात व्यवसाय करणे कठीण होत असल्याच्या तक्रारी व्यापारी आणि इतर व्यावसायिकांकडून गेली काही वर्षे सातत्याने करण्यात येत आहेत. अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने चळवळीत शिरलेल्या गुंड प्रवृत्तींचा बिमोड करण्याबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व इतर संबंधितांकडे यापूर्वी अनेक वेळा तक्रारी केल्या आहेत; मात्र सहा महिने होत आले तरी पोलिसांकडून कोणतेही कारवाई झालेली नसून त्यामुळे व्यापारी वर्गाला होणारा उपद्रव वाढला आहे.

माथाडी क्षेत्रामध्ये बळकावलेली गुंडगिरी आणि बेकायदा ठेकेदारी मोडून काढावी यासाठी अखिल भारतीय माथाडी ट्रान्सपोर्ट आणि जनरल कामगार युनियनने सरकार दरबारी अनेक वेळा निवेदने दिली; मात्र आश्वासन देऊनही कारवाई शून्य असल्याचे संघटनेचे सरचिटणीस अविनाश बाबुराव रामिष्टे यांनी सांगितले. परिस्थिती अशीच राहिल्यास व्यापक आंदोलन उभारण्याशिवाय माथाडी संघटनांसमोर उपाय राहणार नाही, असा इशारा अविनाश रामिष्टे यांनी दिला आहे.

Pune Accident : कोरेगाव पार्क परिसरात भीषण दुर्घटना; भरधाव कारची मेट्रोच्या खांबाला जोरदार धडक, गाडीचे झाले तुकडे, २ भावांचा जागीच मृत्यू |Video

Women’s World Cup : ऐतिहासिक विजेतेपदाचे लक्ष्य; भारत-दक्षिण आफ्रिका महिला संघांत आज अंतिम लढत

जयपूर हादरले! सहावीतल्या विद्यार्थिनीची आत्महत्या; शाळेतल्या चौथ्या मजल्यावरून उडी मारून संपवलं जीवन, CCTV कॅमेऱ्यात थरारक घटना कैद

Women’s World Cup : क्रिकेटप्रेमींसाठी खुशखबर! महिला विश्वचषक फायनलसाठी हार्बर लाईनवरील मेगा ब्लॉक रद्द

मांडवा जेट्टी कोसळण्याच्या उंबरठ्यावर? प्रवाशांचा जीव धोक्यात; सागरी मंडळाचे दुर्लक्ष