मुंबई

कौशल्य विद्यापीठ, टाटा ट्रेंटमध्ये सामंजस्य करार; मोठ्या प्रमाणात रोजगार निर्माण होणार -मंगलप्रभात लोढा

मंत्रालय दालन येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि टाटा ट्रेंटच्या जुडियोसोबत झालेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर मंगलप्रभात लोढा बोलत होते.

Swapnil S

प्रतिनिधी/मुंबई : महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि टाटा ट्रेंटच्या जुडियोसोबत झालेल्या सामंजस्य करारामुळे आगामी पाच वर्षांत अधिकाधिक रोजगाराच्या संधी निर्माण होतील, असे मत कौशल्य, रोजगार, उद्योजकता विकास मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी व्यक्त केले.

मंत्रालय दालन येथे महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ आणि टाटा ट्रेंटच्या जुडियोसोबत झालेल्या सामंजस्य करारावर स्वाक्षरी केल्यानंतर मंगलप्रभात लोढा बोलत होते. यावेळी महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठाच्या कुलगुरू डॉ. अपूर्वा पालकर, व्यवसाय शिक्षण व प्रशिक्षण संचालनालयाचे संचालक दिगंबर दळवी, टाटा ट्रेंटच्या जुडियो रिटेल अकॅडमीचे प्रमुख सशनाथन पद्याची, एच. आर. टीमचे कमलेश खरात, आर. प्रिया, पुष्पा गुप्ता यावेळी उपस्थित होते. लोढा म्हणाले की, कौशल्य विकास विभाग हा उमेदवार व औद्योगिक संस्था यांच्यामधील दुवा बनून योग्य उमेदवाराला योग्य रोजगार देण्याचे महत्त्वपूर्ण काम करणार आहे. महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ टाटा ट्रेंटच्या जुडियोसाठी लागणारे मनुष्यबळ यांना प्रशिक्षण देऊन रोजगाराच्या संधी उपलब्ध करून देईल. ज्या व्यक्तींनी रोजगार प्राप्त केला आहे त्याला जुडियोसाठी लागणारे अधिकाधिक कौशल्य विकसित करण्यावर ती भर देण्यात येईल. आगामी पाच वर्षांत किमान पाच हजार रोजगार या माध्यमातून निर्माण होतील, अशी आशा आहे.

नुकतेच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत महाराष्ट्र राज्य कौशल्य विद्यापीठ, महाराष्ट्र राज्य नाविन्यता सोसायटी आणि बीव्हीजी यांच्यात सामंजस्य करार झाला असून कोपरी ठाणे येथे पहिली स्वच्छ भारत अकादमी ठाण्यात होणार सुरू होणार आहे. स्वच्छ भारत अकादमीमध्ये विविध प्रमाणपत्र, पदविका आणि पदवी अभ्यासक्रम शिकवण्यात येणार आहे.

संजय राऊत यांना गंभीर आजार; बाहेर जाण्यास, गर्दीत मिसळण्यास निर्बंध, पोस्ट करीत म्हणाले - 'नवीन वर्षात भेटू'

New Rules From November 1: उद्यापासून बँकिंग, GST, आधार आणि पेन्शनमध्ये मोठे बदल; तुमच्यावर कसा होणार परिणाम? जाणून घ्या

Powai Hostage Case : 'तो आधी फ्रेंडली होता, नंतर...'; ओलिस ठेवलेल्या मुलीने सांगितला घटनेचा थरार

Powai Hostage Case : माजी मंत्री दीपक केसरकरांचा जुना व्हिडिओ व्हायरल; रोहित आर्यच्या प्रकल्पाचं केलं होतं कौतुक

कल्याणमध्ये ३० वर्षांपासून राहणाऱ्या नेपाळी महिलेचा पर्दाफाश; भारतीय कागदपत्रांसह मुंबई विमानतळावर घेतले ताब्यात