Mumbai : १०२ बेकरीचालकांना स्टॉप वर्क नोटीस; पालिकेच्या दणक्यानंतर १७५ बेकऱ्यांमध्ये लाकडाचा वापर बंद प्रातिनिधिक छायाचित्र (रेडिट)
मुंबई

Mumbai : १०२ बेकरीचालकांना स्टॉप वर्क नोटीस; पालिकेच्या दणक्यानंतर १७५ बेकऱ्यांमध्ये लाकडाचा वापर बंद

हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबईतील बेकऱ्यांना इंधनाचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पालिकेने कारवाईचा इशारा दिल्यानंतर ही दुर्लक्ष करणाऱ्या १०२ बेकरीचालकांना स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आली आहे. तर कारवाईचा इशारा देताच १७५ बेकरीचालकांनी लाकडाऐवजी इंधनाचा वापर करण्यास सुरुवात केली...

गिरीश चित्रे

मुंबई : हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबईतील बेकऱ्यांना इंधनाचा वापर करणे बंधनकारक करण्यात आले आहे. पालिकेने कारवाईचा इशारा दिल्यानंतर ही दुर्लक्ष करणाऱ्या १०२ बेकरीचालकांना स्टॉप वर्क नोटीस बजावण्यात आली आहे. तर कारवाईचा इशारा देताच १७५ बेकरीचालकांनी लाकडाऐवजी इंधनाचा वापर करण्यास सुरुवात केली असून ६९ बेकऱ्यांमध्ये इंधनाचा वापर करण्याची प्रक्रिया सुरू असल्याची माहिती पालिकेच्या पर्यावरण व वातावरणीय बदल विभागाचे उपायुक्त अविनाश काटे यांनी दिली.

मुंबईतील हवेची गुणवत्ता सुधारण्यासाठी मुंबईतील बेकऱ्या आणि इतर व्यवसायांमध्ये लाकूड आणि कोळशाचा वापर बंद करण्याचे आदेश मुंबई पालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळाने दिले आहेत. उच्‍च न्‍यायालयानेही ९ जानेवारी २०२५ रोजी घेतलेल्‍या सुनावणीत ६ महिन्‍यांच्‍या मुदतीत लाकूड आणि कोळसा याऐवजी पर्यायी स्‍वच्‍छ इंधनाचा अवलंब करण्‍याचे आदेश व्‍यावसायिकांना दिले आहेत.

लाकूड, कोळसा वापरणाऱ्यांवर कारवाईचा बडगा

मुंबईतील प्रदूषण कमी करण्यासाठी पालिका प्रशासनाने लाकूड व कोळसा वापरणाऱ्या बेकऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारला असून त्यांना पीएनजी किंवा एलपीजी यांसारख्या स्वच्छ इंधनावर स्थलांतरित करणे अनिवार्य केले आहे. ज्या बेकरीचालकाने लाकडाऐवजी इंधनाचा वापर करत नसल्याचे निदर्शनास आल्यावर परवाना रद्द करण्यात येईल, असा इशारा दिला आहे.

पुण्यातील सर्वात मोठ्या स्मशानभूमीला इराण-इस्रायल युद्धाचा फटका! गॅस दाहिन्या तात्पुरत्या बंद, महापालिकेचा निर्णय

राज्यात आजपासून नवीन ऑटो रिक्षा व टॅक्सी परवान्यांना ब्रेक; वाहतूक कोंडी आणि प्रदूषण नियंत्रणासाठी सरकारचा मोठा निर्णय

GMLR प्रकल्पातील बाधितांसाठी आनंदाची बातमी! महिनाअखेरीस कांजूरमार्ग येथे मिळणार नवी घरे

म्हाडा मुंबईची २५०० घरांची सोडत महिनाअखेरीस; पत्राचाळीतील घरे यंदाच्या लॉटरीतून वगळणार; एप्रिल महिन्यात प्राप्त अर्जांची लॉटरी

दिल्ली-मुंबई एक्सप्रेसवेवर BMW कारचा भीषण अपघात; प्रसिद्ध उद्योगपती वल्लभ महेश्वरी यांचा मृत्यू