प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

पाणीपुरवठा होणार अधिक सुरळीत; १० हजार लिटरचे २२ पाण्याचे टँकर खरेदी करणार; BMC करणार १० कोटी ४४ लाख रुपये खर्च

मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मुंबई महापालिकेने १० हजार लिटरचे २२ पाण्याचे टँकर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १० कोटी ४४ लाख १९ हजार ४६८ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मुंबई महापालिकेने १० हजार लिटरचे २२ पाण्याचे टँकर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १० कोटी ४४ लाख १९ हजार ४६८ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

मुंबईत वॉटर टँकरची संख्या कमी असल्याने सोसायटीतील रहिवाशांना वेळेवर महापालिकेचे टँकर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी मुंबईकर स्थानिक नगरसेवकांकडे करत असतात. वाढत्या तक्रारी लक्षात घेता मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेने वॉटर टँकर वाढविण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार आता २२ नवीन वॉटर टँकर खरेदी करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतल्याचे दिसून येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये दैनंदिन कामासाठी तसेच मुख्य जलवाहिनी दुरुस्ती, दूषित पाणीपुरवठा, अपुरा पाणीपुरवठा, सार्वजनिक उत्सव, निवडणूक कार्यक्रम, विविध सरकारी कार्यक्रम, आपत्कालीन परिस्थिती आदी प्रसंगी जलवाहकांची सेवा पुरविण्याची मागणी जल अभियंता विभागाद्वारे आणि पालिकेच्या विविध विभाग कार्यालयामार्फत केली जाते. मात्र, सद्यस्थितीत कार्यकारी अभियंता (परिवहन) पाणीपुरवठा उपविभागात ३७पाण्याचे टँकर्स असून त्यांच्यामार्फत

शहर, पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरे येथील विविध विभागांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. अशावेळी पाण्याच्या टँकर्सअभावी अनेक विभागात पालिकेला पाणीपुरवठा करण्यास मोठा अडथळा येतो. यामुळे आता पालिकेने या समस्यांपासून नागरिकांची सुटका व्हावी, याकरिता १० हजार लिटरचे २२ पिण्याच्या पाण्याचे टँकर्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mira Bhayandar :अनधिकृत पंप लावून पाणी उपसा करणाऱ्यांवर कारवाई; ५० हजारांचा दंड, नळजोडणीही खंडित होणार

MMC कडून तक्रारींच्या निवारणाला गती; ४३ प्रकरणे निकाली, मात्र ८४९ तक्रारी प्रलंबित

Mumbai : मेगा एमएसएमई क्रेडिट आऊटरीच कॅम्पला प्रतिसाद; सेंट्रल बैंक ऑफ इंडियाचे आयोजन

Mumbai : बनावट खात्यांचे रॅकेट उद्ध्वस्त; ७.४२ कोटींचे सायबर फ्रॉड उघडकीस

आदिवासीबहुल जिल्ह्यात दोन वर्षांत एकूण ८१४ बालक-माता मृत्यू; पालघर जिल्ह्यात आरोग्य यंत्रणेचे अपयश उघड