प्रातिनिधिक छायाचित्र  
मुंबई

पाणीपुरवठा होणार अधिक सुरळीत; १० हजार लिटरचे २२ पाण्याचे टँकर खरेदी करणार; BMC करणार १० कोटी ४४ लाख रुपये खर्च

मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मुंबई महापालिकेने १० हजार लिटरचे २२ पाण्याचे टँकर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १० कोटी ४४ लाख १९ हजार ४६८ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

Swapnil S

मुंबई : मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत व्हावा यासाठी मुंबई महापालिकेने १० हजार लिटरचे २२ पाण्याचे टँकर खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे. यासाठी १० कोटी ४४ लाख १९ हजार ४६८ रुपये खर्च करण्यात येणार आहेत.

मुंबईत वॉटर टँकरची संख्या कमी असल्याने सोसायटीतील रहिवाशांना वेळेवर महापालिकेचे टँकर उपलब्ध होत नसल्याच्या तक्रारी मुंबईकर स्थानिक नगरसेवकांकडे करत असतात. वाढत्या तक्रारी लक्षात घेता मुंबईतील पाणीपुरवठा सुरळीत करण्यासाठी पालिकेने वॉटर टँकर वाढविण्याची मागणी नगरसेवकांनी केली होती. त्यानुसार आता २२ नवीन वॉटर टँकर खरेदी करण्याचा निर्णय महानगरपालिका प्रशासनाने घेतल्याचे दिसून येत आहे.

बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या हद्दीमध्ये दैनंदिन कामासाठी तसेच मुख्य जलवाहिनी दुरुस्ती, दूषित पाणीपुरवठा, अपुरा पाणीपुरवठा, सार्वजनिक उत्सव, निवडणूक कार्यक्रम, विविध सरकारी कार्यक्रम, आपत्कालीन परिस्थिती आदी प्रसंगी जलवाहकांची सेवा पुरविण्याची मागणी जल अभियंता विभागाद्वारे आणि पालिकेच्या विविध विभाग कार्यालयामार्फत केली जाते. मात्र, सद्यस्थितीत कार्यकारी अभियंता (परिवहन) पाणीपुरवठा उपविभागात ३७पाण्याचे टँकर्स असून त्यांच्यामार्फत

शहर, पश्चिम उपनगरे व पूर्व उपनगरे येथील विविध विभागांना पिण्याचे पाणी पुरविण्यात येते. अशावेळी पाण्याच्या टँकर्सअभावी अनेक विभागात पालिकेला पाणीपुरवठा करण्यास मोठा अडथळा येतो. यामुळे आता पालिकेने या समस्यांपासून नागरिकांची सुटका व्हावी, याकरिता १० हजार लिटरचे २२ पिण्याच्या पाण्याचे टँकर्स खरेदी करण्याचा निर्णय घेतला आहे.

Mumbai : धरणांतील पाणीसाठा घटला; BMC चे नवे नियम जाहीर, पाण्याचा गैरवापर केल्यास कारवाईचा इशारा

NEET UG 2026 Re-Exam : टेलिग्रामवर २२ जूनपर्यंत बंदी; परीक्षेआधी NTA चा मोठा निर्णय

आता डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन असेल तरच मिळेल कफ सिरप; औषध विक्रीच्या नियमात केंद्र सरकारचा मोठा बदल

पवनराजे निंबाळकर हत्याकांडाचा निकाल पुन्हा लांबणीवर; आता २० जूनला होणार निर्णय

सौरव गांगुलींकडून फेसबुक पेजविरोधात तक्रार दाखल; खोटी माहिती पसरवल्याचा आरोप