मुंबई

Mumbai : वेस्टर्न रेल्वेच्या प्रवाशांना दिलासा; AC लोकलच्या फेऱ्या वाढणार, १९ फेब्रुवारीपासून सेवा सुरु

एसी लोकल प्रवासाची लोकप्रियता वाढत असताना सर्वसामान्य प्रवाशांसाठी परवडणाऱ्या सेवांची आवश्यकता लक्षात घेऊन हा बदल करण्यात आल्याचे वेस्टर्न रेल्वेने स्पष्ट केले आहे.

किशोरी घायवट-उबाळे

मुंबई उपनगरीय रेल्वे नेटवर्कमध्ये प्रवाशांसाठी वेस्टर्न रेल्वेने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. १९ फेब्रुवारी २०२६पासून वेस्टर्न रेल्वेच्या मार्गावर १२ नवीन एसी लोकल सेवा आणि ३ नॉन-एसी सेवा सुरू होणार आहेत.

एसी लोकल प्रवासाची लोकप्रियता वाढत असताना सर्वसामान्य प्रवाशांसाठी परवडणाऱ्या सेवांची आवश्यकता लक्षात घेऊन हा बदल करण्यात आल्याचे वेस्टर्न रेल्वेने स्पष्ट केले आहे. नव्या सेवांमुळे गर्दी कमी होण्यास मदत होईल आणि प्रवास अधिक आरामदायी होईल, अशी अपेक्षा आहे.

१२ एसी लोकल सेवांची भर

वेस्टर्न रेल्वेने दिलेल्या माहितीनुसार १२ एसी लोकलपैकी ११ सेवा विद्यमान नॉन-एसी लोकलचे रूपांतर असतील, तर एक लोकल पूर्णपणे नवीन एसी सेवा असेल. याशिवाय, ३ नॉन-एसी लोकल सेवांचीही नव्याने भर करण्यात आली आहे.

या बदलांनंतर वेस्टर्न रेल्वे नेटवर्कवरील एकूण एसी लोकल सेवा १२१ वरून १३३ इतक्या वाढतील, तर एकूण लोकल सेवांची संख्या १४१० वरून १४१४ इतकी होईल.

वीकेंडला मोठी सुविधा

माहितीनुसार, शनिवारी आणि रविवारी धावणाऱ्या एसी लोकल सेवांमध्येही मोठी वाढ केली आहे. एसी लोकल सेवा ७७ वरून थेट १०६ होणार आहेत. यामुळे विकेंडला प्रवास करणाऱ्या प्रवाशांना अधिक आरामदायी पर्याय उपलब्ध होणार आहेत.

भाईंदर-बांद्रा लोकल आता विरारपर्यंत

सध्या भाईंदर ते बांद्रा धावणारी स्लो लोकल आता विरारपर्यंत धावणार आहे. यामुळे दूरवरच्या प्रवाशांना अधिक चांगली कनेक्टिव्हिटी मिळेल. वेस्टर्न रेल्वेने म्हटले आहे की, हा उपक्रम मुंबईकरांना अधिक सुरक्षित, कार्यक्षम आणि प्रवासी-अनुकूल सेवा देण्याच्या वचनबद्धतेचा एक भाग आहे.

Mumbai : मुलुंडच्या एलबीएस रोडवर भीषण अपघात; मेट्रो लाईनचा स्लॅब वाहनांवर कोसळला; एकाचा मृत्यू, अनेकजण जखमी, Video

Mumbai : तिन्ही रेल्वे मार्गांवर उद्या मेगा ब्लॉक

Navi Mumbai : लेखनिक परवानगीसाठी लाच; सहाय्यक अधीक्षक जाळ्यात

भटक्या कुत्र्यांना मुंबईबाहेर मिळणार निवारा; सांभाळ करण्याचे खासगी संस्थांना आवाहन; देखभाल केल्यास BMC रक्कम मोजणार

Pulwama Attack : १४ फेब्रुवारी... 'काळा दिवस'; देश कधीच विसरू शकत नाही अशी आठवण