उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी पक्षांची चढाओढ संग्रहित छायाचित्र
मुंबई

BMC Election: उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी पक्षांची चढाओढ

आगामी महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीय मतदारांचा कौल निर्णायक ठरणार असल्याने शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपली रणनीती या मतदारांभोवती केंद्रित केली आहे.

Swapnil S

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीय मतदारांचा कौल निर्णायक ठरणार असल्याने शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपली रणनीती या मतदारांभोवती केंद्रित केली आहे. एकूण मतदारसंख्येच्या अंदाजे १५ ते २५ टक्के असलेल्या या समुदायाचे संख्याबळ उत्तर आणि पूर्व उपनगरांतील अनेक प्रभागांत निकालाची दिशा ठरवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

भाजपकडून उत्तर भारतीय मतदारांशी पारंपरिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक उत्सव आणि स्थानिक संपर्क मोहिमांवर भर दिला जात आहे. ठाकरे सेना सर्वसमावेशक राजकारणाचा संदेश देत उत्तर भारतीय मतदारांशी संवाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे तर कॉंग्रेसने मुस्लिम, दलित, उत्तर भारतीय मतदारांना केंद्रस्थानी ठेवत स्वतंत्र रणनीती आखली आहे.

निर्णायक विभाग

दहिसर-कांदिवली-मलाड

  • गोरेगाव-अंधेरी

  • कुर्ला-घाटकोपर

  • भांडुप-विक्रोळी-चेंबूर

यासाठी उत्तर भारतीय मतदार महत्त्वाचे

  • अनेक प्रभागांत मराठी, मुस्लिम मतांइतकेच संख्याबळ

  • निर्णायक लढतीत निकालाची दिशा बदलण्याची क्षमता

  • लोकसभेत निर्णायक भूमिका बजावल्याचा अनुभव

Delhi Riots 2020 : गुप्तचर अधिकारी अंकित शर्मा हत्येप्रकरणी माजी AAP नगरसेवक ताहीर हुसेनला जन्मठेप

Bhiwandi Building Collapse : पंतप्रधान मोदींनी व्यक्त केला शोक; मृतांच्या नातेवाईकांना आर्थिक मदत जाहीर

भिवंडीत चार मजली इमारत कोसळली; ९ जणांचा मृत्यू, अनेकजण ढिगाऱ्याखाली अडकल्याची भीती, Video

August 2026 Dry Days : ऑगस्टमध्ये पार्टीचा प्लॅन करताय? 'या' २ दिवशी बंद राहणार दारूची दुकाने

रेल्वे प्रवाशांसाठी खुशखबर! जादा सामानासाठी आता रांगेत उभं राहायची गरज नाही; जाणून घ्या नवे नियम