उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी पक्षांची चढाओढ संग्रहित छायाचित्र
मुंबई

BMC Election: उत्तर भारतीयांना आकर्षित करण्यासाठी पक्षांची चढाओढ

आगामी महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीय मतदारांचा कौल निर्णायक ठरणार असल्याने शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपली रणनीती या मतदारांभोवती केंद्रित केली आहे.

Swapnil S

मुंबई : आगामी महापालिका निवडणुकीत उत्तर भारतीय मतदारांचा कौल निर्णायक ठरणार असल्याने शहरातील सर्व प्रमुख राजकीय पक्षांनी आपली रणनीती या मतदारांभोवती केंद्रित केली आहे. एकूण मतदारसंख्येच्या अंदाजे १५ ते २५ टक्के असलेल्या या समुदायाचे संख्याबळ उत्तर आणि पूर्व उपनगरांतील अनेक प्रभागांत निकालाची दिशा ठरवण्यासाठी कारणीभूत ठरू शकतात.

भाजपकडून उत्तर भारतीय मतदारांशी पारंपरिक संबंध अधिक बळकट करण्यासाठी सांस्कृतिक कार्यक्रम, धार्मिक उत्सव आणि स्थानिक संपर्क मोहिमांवर भर दिला जात आहे. ठाकरे सेना सर्वसमावेशक राजकारणाचा संदेश देत उत्तर भारतीय मतदारांशी संवाद वाढवण्याचा प्रयत्न करत आहे तर कॉंग्रेसने मुस्लिम, दलित, उत्तर भारतीय मतदारांना केंद्रस्थानी ठेवत स्वतंत्र रणनीती आखली आहे.

निर्णायक विभाग

दहिसर-कांदिवली-मलाड

  • गोरेगाव-अंधेरी

  • कुर्ला-घाटकोपर

  • भांडुप-विक्रोळी-चेंबूर

यासाठी उत्तर भारतीय मतदार महत्त्वाचे

  • अनेक प्रभागांत मराठी, मुस्लिम मतांइतकेच संख्याबळ

  • निर्णायक लढतीत निकालाची दिशा बदलण्याची क्षमता

  • लोकसभेत निर्णायक भूमिका बजावल्याचा अनुभव

Mumbai : कोस्टल रोडवर भरधाव BMW पुलावरून कोसळली; तिघांचा जागीच मृत्यू, अपघाताचा थरार CCTV मध्ये कैद

UPI व्यवहारांवरील शुल्क हा नागरिकांसाठी 'डिजिटल सापळा'; राज ठाकरेंचा केंद्र सरकारवर हल्ला

भारताचा GDP ३८ लाख कोटी डॉलरवर पोहोचेल; राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांचा विश्वास

Mumbai : पूरमुक्तीसाठी महापालिकेचा ॲक्शन प्लॅन; १३ हजार कोटींचा खर्च अपेक्षित

Mumbai : शस्त्रक्रियेदरम्यान मज्जातंतूंचे नुकसान टाळण्यास मदत; पालिका रुग्णालयांत 'इंट्रा ऑपरेटिव्ह नर्व्ह मॉनिटरिंग' प्रणाली