ANI
मुंबई

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी जग जिंकले ;मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

नवशक्ती Web Desk

मुंबई : ‘वसुधैव कुटुंबकम‌्’ ही संकल्पना घेऊन भारताने जी-२० परिषदेचे यजमानपद स्वीकारले आणि यशस्वी आयोजनही केले. या राष्ट्रगटाच्या अध्यक्षपदाचा सन्मान पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या रूपाने भारताला प्रथमच मिळाला. ही देशवासीयांसाठी मोठी गर्वाची गोष्ट आहे. नरेंद्र मोदी यांनी देशाची कीर्ती जगभर पोहोचविली. देशाला महासत्ता बनविण्यासाठी ते अविरत परिश्रम घेत आहेत. त्याचेच एक सकारात्मक चित्र देशाने पाहिले. नरेंद्र मोदींनी जग जिंकले असून भारतासाठी तो एक ऐतिहासिक सुवर्णदिन होता, अशा शुभेच्छा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिल्या आहेत.

अमेरिका, इंग्लंड, फ्रान्स, कॅनडा आदी अनेक बलाढ्य राष्ट्रांचे प्रमुख दिल्लीत आले होते. एकमताने आणि एक भावनेने एकत्र येऊन अधिक समृद्ध आणि सुसंवादी भविष्यासाठी काम करण्याचे वचन पंतप्रधानांनी यावेळी दिले. या शिखर परिषदेत पंतप्रधानांनी मांडलेला दिल्ली जाहीरनामा एकमताने स्वीकारण्यात आला. जी-२० समूहाने टाळ्या वाजवून तो स्वीकारला व बाके वाजवून स्वागत केले, हे आपले मोठे राजनैतिक यश असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे म्हणाले.

या शिखर परिषदेच्या निमित्ताने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भारत याचे महत्त्व पुन्हा एकदा अधोरेखित झाले. हे देशाच्या इतिहासातले सोनेरी पान आहे. नरेंद्र मोदींची जागतिक स्तरावरचा नेता अशी निर्माण झालेली प्रतिमा भारतासाठी निश्चितच अभिमानास्पद असल्याचेही मुख्यमंत्री शिंदे यांनी ट‌्विटद्वारे स्पष्ट केले आहे.

मुंबईत आज पाऊस बरसणार; १६ ऑक्टोबरपर्यंत महाराष्ट्रासह 'या' राज्यांत मुसळधारचा IMD चा इशारा

विधानसभेचे रणशिंग फुंकणार; दसरा मेळाव्यात उद्धव ठाकरे-एकनाथ शिंदे भिडणार!

IND vs BAN 3rd T20I : टीम इंडिया आज क्लीन स्वीपचे 'तोरण' बांधणार; 'या' ४ खेळाडूंना संधी मिळणार?

रतन टाटांचा वारसदार मिळाला; नोएल टाटा बनले टाटा ट्रस्टचे चेअरमन

इस्रायलचा लेबनॉनमधील संयुक्त राष्ट्रांच्या इमारतीवर हल्ला; भारताकडून चिंता व्यक्त