मुंबई

डहाणू-विरार रेल्वे चौपदरीकरणासाठी २५४३८ कांदळवनाची कत्तल ;मुंबई उच्च न्यायालयाची परवानगी

दुसऱ्या बाजुला उपनगरी प्रवाशांची संख्या सतत वाढत असून ज्यादा गाड्यांची मागणी वाढत आहे

उर्वी महाजनी

मुंबई: मंगळवारी मुंबइ उच्च न्यायालयाने विरार-डहाणू रेल्वेमार्गाचे चौपदरीकरण करण्यासाठी २५४३८ कांदळवनतोड करण्यास सशर्थ परवानगी दिली. त्या बदल्यात पश्चिम रेल्वेने वनीकरण करायची अट घालण्यात आली आहे.

न्यायमूर्ती के आर श्रीराम आणि न्या. नीला गोखले यांनी भारत सरकारच्या याचिकेवर सुनावणी देतांना ही परवानगी दिली आहे. केंद्र सरकारने सध्याचा रेल्वेमार्ग लांब पल्ल्याच्या गाड्या, मालगाड्या, आणि उपनगरी गाड्यांमुळे गच्च भरुन गेला आहे. त्या मार्गाची १०० टक्के क्षमता वापरात आली असल्यामुळे येथे उमनगरी सेवा गाड्यांची संख्या वाढवणे शक्य नाही.तेव्हा चौपदरीकरणाची गरज आहे हे सरकारने न्यायालयाला पटवून दिले. दुसऱ्या बाजुला उपनगरी प्रवाशांची संख्या सतत वाढत असून ज्यादा गाड्यांची मागणी वाढत आहे. म्हणून कांदळवनाची छाटणी करण्यास न्यायालयाने परवानगी दिली आहे.

दारूवरील व्हॅट, परवाना शुल्कवाढीला विरोध; सोमवारी राज्यातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्स बंद

नवी मुंबई विमानतळावरून सप्टेंबरअखेरीस टेक ऑफ; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन

Ahmedabad Plane Crash: इंधन पुरवठा बंद, विमान कोसळले; एएआयबीचा प्राथमिक अहवाल सादर, वैमानिकांमधील अखेरचा संवाद उघड

शरद पवार गटाचे नवे कॅप्टन शशिकांत शिंदे ? मंगळवारी प्रदेशाध्यक्ष पदाची घोषणा, जयंत पाटील पायउतार होणार

आयफोन, आयवॉचने कळणार स्त्री गर्भवती आहे का? कृत्रिम बुद्धिमत्तेची मदत