मुंबई

ठाणे कोर्टाने राहुल गांधींना ठोठावला ५०० रुपयांचा दंड

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव घेतल्याने एका कार्यकर्त्याने राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता.

Swapnil S

ठाणे : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना ठाण्यातील कोर्टाने ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव घेतल्याने एका कार्यकर्त्याने राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात लेखी जबाब नोंदवण्यात विलंब केल्यानं गांधी यांना कोर्टाने ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मानहानीच्या खटल्यात उत्तर दाखल करण्यास उशीर केल्याबद्दल राहुल गांधींना ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी आरएसएसचा संबंध जोडणाऱ्या माजी खासदार राहुल गांधी यांच्या कथित वक्तव्याबद्दल आरएसएसचे स्वयंसेवक विवेक चंपानेरकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता.

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या संदर्भात संघाचे (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) नाव जोडल्याबद्दल संघ कार्यकर्त्याने राहुल गांधी यांच्यावर दाखल केलेल्या दिवाणी मानहानीच्या खटल्यात लेखी म्हणणे दाखल करण्यास विलंबबाबतचे आदेश ठाणे येथील न्यायालयाने शुक्रवारी दिले. काँग्रेस खासदाराला ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्याकडून लेखी निवेदन दाखल करण्यात ८८१ दिवसांचा विलंब झाला आणि त्यांचे वकील नारायण अय्यर यांनी या विलंबाची क्षमा मागणारा अर्ज दाखल केला होता.

Mumbai : गणेशमूर्तींच्या उंचीची स्पर्धा अयोग्य; डीजेच्या कर्णकर्कश आवाजामुळे ध्वनिप्रदूषण, उपमहापौर संजय घाडी यांचे आवाहन

Ganeshotsav 2026 : अनंत चतुर्दशीला पश्चिम रेल्वेकडून रात्री उशिरापर्यंत लोकल सेवा; चर्चगेट-विरारदरम्यान १२ विशेष फेऱ्या, जाणून घ्या वेळापत्रक

‘वन नेशन, वन ई-चलान’ प्रकल्पाला मान्यता; वाहतूक नियमभंगावर प्रभावी कारवाईसाठी प्रकल्प

दिल्ली हादरली! मित्राला भेटायला गेली अन्...; १७ वर्षीय मुलीची सामूहिक अत्याचारानंतर निर्घृण हत्या, चौघे पोलिसांच्या ताब्यात

ठाणे पालिका अतिरिक्त आयुक्तांचा ‘दर्जा’ बदलला! प्रशांत रोडे अतिरिक्त आयुक्त-१, डॉ. नितीन राठोड अतिरिक्त आयुक्त-२