मुंबई

ठाणे कोर्टाने राहुल गांधींना ठोठावला ५०० रुपयांचा दंड

Swapnil S

ठाणे : काँग्रेस नेते आणि खासदार राहुल गांधी यांना ठाण्यातील कोर्टाने ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नाव घेतल्याने एका कार्यकर्त्याने राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता. या प्रकरणात लेखी जबाब नोंदवण्यात विलंब केल्यानं गांधी यांना कोर्टाने ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे.

मानहानीच्या खटल्यात उत्तर दाखल करण्यास उशीर केल्याबद्दल राहुल गांधींना ५०० रुपयांचा दंड ठोठावला आहे. पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येशी आरएसएसचा संबंध जोडणाऱ्या माजी खासदार राहुल गांधी यांच्या कथित वक्तव्याबद्दल आरएसएसचे स्वयंसेवक विवेक चंपानेरकर यांनी काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्याविरुद्ध मानहानीचा खटला दाखल केला होता.

पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्येच्या संदर्भात संघाचे (राष्ट्रीय स्वयंसेवक संघ) नाव जोडल्याबद्दल संघ कार्यकर्त्याने राहुल गांधी यांच्यावर दाखल केलेल्या दिवाणी मानहानीच्या खटल्यात लेखी म्हणणे दाखल करण्यास विलंबबाबतचे आदेश ठाणे येथील न्यायालयाने शुक्रवारी दिले. काँग्रेस खासदाराला ५०० रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. राहुल गांधी यांच्याकडून लेखी निवेदन दाखल करण्यात ८८१ दिवसांचा विलंब झाला आणि त्यांचे वकील नारायण अय्यर यांनी या विलंबाची क्षमा मागणारा अर्ज दाखल केला होता.

"नव्या भारतासाठी ‘हिंदवी स्वराज्या`ची गरज!" योगी आदित्यनाथ यांची तोफ नालासोपाऱ्यातून धडाडली!

पाचव्या टप्प्यातील प्रचार संपला; अखेरच्या क्षणी मतदार भेटीसाठी सर्वपक्षीय लगबग

काय सांगता? एप्रिलमध्ये तब्बल ३ लाख लोकांनी खरेदी केली 'ही' बाईक, पाहा लिस्ट

मुंबई: धरणांतील जलसाठा घटला; १५ जुलैपर्यंत तहान भागेल इतकाच पाणीसाठा

World Bee Day 2024: जागतिक मधमाशी दिन,का साजरा केला जातो हा दिवस? जाणून घ्या महत्त्व