मुंबई

दुसऱ्या दिवशी अंगणवाडी सेविका आक्रमक; सुरक्षा बॅरिकेट्स तोडून मंत्रालयाकडे जाण्याच्या प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडला

अनेक महिलांची मुले गावी आहेत. त्यांची काळजी लागली आहे. जेवण करायला पैसे नाहीत. गावावरून बांधून आणलेल्या भाकरी संपल्या आहेत. स्वच्छतागृहात पैसे घेत आहेत.

Swapnil S

मुंबई : अंगणवाडी सेविकांच्या विविध मागण्यांप्रती सरकार अद्यापही शांत असल्यामुळे गुरुवारी आझाद मैदानात या महिला आक्रमक झाल्या. पोलिसांनी लावलेल्या सुरक्षा बॅरिकेट्स जवळ अंगणवाडी सेविका आक्रमक होत बॅरिकेट्स तोडून रास्ता रोको व मंत्रालयाकडे जाण्यासाठी सर्व ताकद पणाला लावत होत्या. मात्र पोलिसांनी तो प्रयत्न हाणून पाडला.

दरम्यान, आंदोलनादरम्यान संगीता जाधव या अंगणवाडी मदतनीस महिलेचा हार्टअटॅकने मृत्यू झाला. तर मंगल गुजर यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात हलविण्यात आले. लाखोंच्या संखेने आलेल्या या अंगणवाडी सेविका आझाद मैदानातील धुळीमुळे खोकत आहेत. अपुरे पिण्याचे पाणी, स्वच्छतागृहांची कमतरता, जेवणाचे हाल, फोन चार्जिंगची असुविधा, डास, दुर्गंधी, पहाटे थंडी अशी बिकट अवस्था या अंगणवाडी सेविका, मदतनीस यांची झाली आहे.

अनेक महिलांची मुले गावी आहेत. त्यांची काळजी लागली आहे. जेवण करायला पैसे नाहीत. गावावरून बांधून आणलेल्या भाकरी संपल्या आहेत. स्वच्छतागृहात पैसे घेत आहेत. पिण्याचे पाणी अशुद्ध आहे, असे सीमा कदम या अंगणवाडी सेविकेने सांगितले. मंत्रालयात शिष्टमंडळ चर्चा करायला गेले तेव्हा सर्व अंगणवाडी सेविका निषेध गाणी म्हणत होत्या. तर काही महिलांना प्रसिद्धी माध्यमांनी घेरले होते.

मुंबईसह राज्यातील कबुतरखाने बंद होणार; उद्योग मंत्री उदय सामंत यांची माहिती

बाळ चोरीला गेल्यास रुग्णालयाची नोंदणी रद्द होणार; राज्य सरकारचा निर्णय

मुंबई, दिल्ली मेट्रो शहरांचा झगमगाट आता संधीच्या नकाशावर मागे! आता Freshers साठी चेन्नई ठरतंय पगाराचा नवा 'हॉटस्पॉट'

आता २४ तास वाळू वाहतूक; GPS, CCTV बसवणे बंधनकारक; महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची सभागृहात घोषणा

सरकारी यंत्रणा शेतकऱ्यांची मारेकरी! महाराष्ट्रातील शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर राहुल गांधी आक्रमक