मुंबई

कांदिवलीतून तीन बांगलादेशी नागरिकांना अटक

प्रतिनिधी

मुंबई : कांदिवलीतून तीन बांगलादेशी नागरिकांना चारकोप पोलिसांच्या एटीएस पथकाने अटक केली. शुमोन शाहेब सबदर, अब्दुल रहिम मोहम्मद फरकान मुल्ला आणि मोहम्मद उज्जाल नरुल शेख अशी या तिघांची नावे आहेत. अटकेनंतर या तिघांनाही मंगळवारी बोरिवलीतील लोकल कोर्टाने पोलीस कोठडी सुनावली आहे. कांदिवलीतील चारकोप परिसरात काही बांगलादेशी नागरिक वास्तव्यास असल्याची माहिती चारकोप पोलिसांना मिळाली होती. या माहितीची शहानिशा करण्यासाठी या पथकाने सोमवारी सायंकाळी भूमीपार्क रोड, म्हाडा, एकतानगर परिसरात साध्या वेशात पाळत ठेवली होती. सायंकाळी सात वाजता तिथे तीन तरुण आले होते. या तिघांची हालचाल संशयास्पद वाटताच त्यांना पोलिसांनी चौकशीसाठी ताब्यात घेतले. चौकशीदरम्यान ते तिघेही बांगलादेशी नागरिक असल्याचे उघडकीस आले. या तिघांकडून पोलिसांनी तीन मोबाईल जप्त केले आहे. या मोबाईलची पाहणी केल्यानंतर ते त्यांच्या बांगलादेशात राहणाऱ्या कुटुंबीयांसह नातेवाईक आणि मित्रांच्या संपर्कात असल्याचे उघडकीस आले.

“शरद पवार साहेबांसोबत राहूनही त्यांनी...” राज ठाकरेंनी केलं अजित पवारांचं कौतुक

"आमच्यासोबत या, तुमची स्वप्नं पूर्ण होतील..."नंदुरबारमधील सभेत मोदींची शरद पवार, उद्धव ठाकरेंना खुली ऑफर

मोठी बातमी! अरविंद केजरीवालांना 'सर्वोच्च' दिलासा; १ जूनपर्यंत अंतरिम जामीन मंजूर

Pradeep Sharma : एन्काउंटर स्पेशालिस्ट प्रदीप शर्मांना मोठा दिलासा, सुप्रीम कोर्टाकडून जामीन मंजूर

Narendra Dabholkar Murder Case: दोघांना जन्पठेप, तिघांची निर्दोष सुटका; ११ वर्षांनी आला निकाल