मुंबई

मुंबई : वाद सोडवण्यासाठी गेली, अन् हत्येच्या गुन्ह्यात अडकली! सामाजिक कार्यकर्त्या महिलेला तीन महिन्यांनी जामिन

जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ज्योती शिंदे यांच्या वतीने अ‍ॅड. सुमीत काटे यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती

Swapnil S

मुंबई : दोन गटांतील वादातून झालेल्या हत्येप्रकरणी अटक करण्यात आलेल्या सामाजिक कार्यकर्त्या महिलेला तीन महिन्यांनंतर उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला. न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी आरोपी ज्योती शिंदे ही दोन गटातील वाद सोडवण्यासाठी गेली असल्याचा युक्तिवाद ग्राह्य धरत १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्याचा जमीन मंजूर केला.

चिंचवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत २५ ऑगस्ट रोजी मध्यरात्री एक ते दीड वाजण्याच्या सुमारास दोन गटांमध्ये झालेल्या वादातून नागेश उर्फ कृष्णा भंडारी या तरुणाची धारदार शस्त्राच्या सहाय्याने हत्या झाली. या प्रकरणी पोलिसांनी ज्योती शिंदेसह दोघा आरोपींविरोधात हत्येसह अन्य कलमांतर्गत गुन्हा दाखल करून १५ सप्टेंबर रोजी चिंचवड पोलिसांनी अटक केली.

जिल्हा न्यायालयाने जामीन अर्ज फेटाळल्यानंतर ज्योती शिंदे यांच्या वतीने अ‍ॅड. सुमीत काटे यांनी जामिनासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. त्या याचिकेवर न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी अ‍ॅड. सुमीत काटे यांनी आरोपी ही सामाजिक कार्यकर्ती असल्याने दोन गटात झालेला वाद मिटविण्यासाठी घटनास्थळी गेली होती. पोलिसांनी त्यांच्यावरच संशय घेत नाहक हत्येचा गुन्हा दाखल केल्याचा दावा केला. ही वस्तुस्थिती व इतर बाबींची दखल घेत न्यायमूर्ती मकरंद कर्णिक यांनी ज्योतीला १५ हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर जामीन मंजूर केला. दरम्यान, ज्योतीला १५ सप्टेंबर रोजी चिंचवड पोलिसांनी अटक केली होती.

NEET UG 2026 Re-Exam : नागपूरच्या विद्यार्थ्याचे परीक्षा केंद्र थेट अबूधाबीत; पुनर्परीक्षेच्या आदल्या दिवशी NTA चा भोंगळ कारभार उघड

Mumbai : म्हाडा ॲक्शन मोडवर; ८६ अतिधोकादायक इमारती रिकाम्या करण्याचे निर्देश

राज्यात उष्माघाताचे १० बळी, १९ संशयित मृत्यू; आरोग्य विभागाच्या अहवालातील माहिती

सरकारी जमिनीवर मालकी नोंदवणाऱ्यांना दणका; भाडेपट्टा नोंदीवर आता ‘महाराष्ट्र शासन’ कब्जेदार

रिलायन्समधील सत्तांतराची प्रक्रिया अंतिम टप्प्यात; मुकेश अंबानी यांच्याकडून नव्या पिढीकडे सूत्रे सुपूर्द